शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

परळी खोऱ्यातील प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:41 IST

परळी : ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशीच काहीशी परिस्थिती या भागाची झाली आहे. जलसंधारणाचे मोठे चार प्रकल्प या ...

परळी : ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशीच काहीशी परिस्थिती या भागाची झाली आहे. जलसंधारणाचे मोठे चार प्रकल्प या भागात असले तरी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा, येथील लोकप्रतिनिधींचे अपयशच आहे. मात्र, या भागातील धरणग्रस्तांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मी स्वतः मांडून शंभर टक्के काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. कृषी पर्यटनासंदर्भातही उपाययोजना करण्यात येतील’, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

भोंदवडे येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परळी भागातील मनसे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कृषीमंत्र्यांच्या हस्ते नित्रळ येथील अतिवृष्टी आपद्ग्रस्त नंदा वांगडे यांना रोख रक्कम देऊन अर्थसाह्य केले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, नारायण निकम, श्यामराव लोटेकर, जिल्हा संघटिका शारदा जाधव, रंजना भोसले, एकनाथ ओंबळे, अनिल गुजर, अतिश ननावरे, विश्वनाथ धनावडे, बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, सचिन जवळ, प्रणव सावंत, रूपाली लेंबे, मंजिरी सावंत, अमर मोहिते, हनुमंत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘पीकविमा यासंदर्भात शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे तसेच पंधरा दिवसांच्या आत कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली. मात्र, या परळी भागातील नेतृत्व खंबीर नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत तसेच निवडणुकीत मते देऊन अकार्यक्षम माणसांना तुम्ही मोठमोठी पदे दिली, ही सगळी खिचडीही तुम्हीच घातलेली आहे.

सचिन मोहिते म्हणाले, ‘या मतदारसंघात चार मोठी धरणे बांधलेली आहेत. यांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. धरणे तयार होऊन वीस वर्षे झाली तरी स्थानिक नेत्यांना या धरणग्रस्तांची व्यथा कधी समजणार, असाच प्रश्न उभा राहत आहे. धरणे बांधून वीस वर्षे झाली तरी वर सरकून राहिलेल्या लोकांना शेतीसाठी पाणीप्रश्न तसेच धरणाच्या खाली असलेल्या शेतीसाठी कॅनालचा पाणीप्रश्न प्रलंबितच आहे. कारण, खाली कॅनॉल नाही आणि वरच्या भागासाठी पाइपलाइनद्वारे केलेले पाइप नाहीत. मग, हा शासनाकडून आलेला सर्व निधी गेला तरी कुठे, यासंदर्भातही चौकशी नक्कीच झाली पाहिजे.’

(चौकट)

नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची सूट...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना अन्नदेवता म्हणून संबोधतात. यामुळेच सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कोरोनाकाळ असूनही ३१ लाख जणांना कर्जमुक्त केले तसेच यासाठी २१ हजार कोटी राज्य सरकारने उभे केले. एवढ्या मोठ्या महामारीत आर्थिक अडचण असतानादेखील एवढी मोठी रक्कम महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत मदत देणारे हे पहिले सरकार आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची सूटदेखील देण्याची तरतूद केली होती, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

फोटो..

२६परळी

भोंदवडे (ता. सातारा) येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात कृषीमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले.