शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काकांकडील सत्ता नव्या पिढीकडे!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

आता दहिवडीला वेध : नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?

नवनाथ जगदाळे --दहिवडी --लोणंद ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने आता दहिवडीलाही लवकरच नगरपंचायत दर्जा मिळणार आहे. दहिवडीला नगरंपचायत झाल्यानंतर अनेक सुविधा मिळणार, अशी चर्चा होत असल्याने ‘नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?,’ असा प्रतिप्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. त्यातच नगरंपचायत होण्याने दोन्ही काकांकडील सत्ता कदाचित नवीन पिढीकडे जाऊ शकते. सातारा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यापैकी लोणंद नगरपंचायत झाल्याने त्या पाठोपाठ आता दहिवडीलाही नगरपंचायत होणार, हे जवळपास निश्चित आहे. फक्त ती कधी होणार एवढाच प्रश्न राहणार आहे. दहिवडी नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाल्याने औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. त्यामुळे याची उत्सुकता लागून राहिली आहे. दहिवडी नगरपंचायत होताच अनेक राजकीय संदर्भ बदलणार आहेत. पूर्वीपासून वॉर्डरचना दहिवडीला अस्तित्त्वात होती. ६ वॉर्डमधून १७ उमेदवार निवडून जात होते. त्यापैकी भवानवाडी वॉर्ड वाड्या -वस्त्या तर तुपेवाडी व विठोबा वॉर्ड, काही प्रमाणात गांधी वॉर्डाची रचना शहर व वाड्या-वस्त्या असा होता. तर श्रीराम वॉर्ड व सिद्धनाथ वॉर्ड दहिवडी मुख्य शहरात होता. त्यामुळे ग्रामपंचायतीला प्रतिनिधी निवडून देताना लोकांच्या अंगवळणी पडले होते. आता नवीन अध्यादेशानुसार प्रभाग पद्धत झाल्यास काही ठिकाणी उमेदवार देताना, प्रतिनिधी निवडून देताना कसरत करावी लागणार आहे. भटकीमळा, भवानवाडी, डबरमळा, तुपेवाडी, शिंदेमळा, कटपाळेमळा या वाड्या-वस्त्यांना स्वत:च्या उमेदवाराला मतदान करता येत होते; परंतु प्रभाग रचनेमुळे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार असल्याने लोकांना राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे व पंचायत समिती सदस्य व विद्यमान उपसभापती अतुल जाधव यांच्यानंतर दहिवडी हे गाव पूर्णत: वगळले जाणार असल्याने त्यांची ही शेवटची टर्म असणार आहे. नवीन प्रभाग रचनेमुळे ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या काळापासून राहिलेली दोन्ही काकांकडील सत्ता हळूहळू नवीन पिढीकडे सरकणार आहे. प्रभाग रचनेमुळे प्रत्येकाच्या वैयक्तिक कामावर मतदान होणार असल्याने नेत्यांचे अस्तित्त्व कमी होऊन बंडोबाचे पेव फुटणार आहे. नगरपंचायत झाल्याने दहिवडी गावाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. दहिवडी शहराचा विकास होणार आहे.पायाभूत सुविधा मिळणार...दहिवडी शहराची लोकसंख्या १७ हजारांच्या वर आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्वच शासकीय मुख्यालये दहिवडीला असल्याने लोकांची येथे नेहमीच वर्दळ असते. अशावेळी त्यांना पायाभूत सुविधा देताना ग्रामपंचायतीवरही ताण येत असतो. नगरंपचायतीमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने उत्पन्न वाढणार आहे. निधी मिळाल्याने पायाभूत सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. तर नुकताच लोंणदला नगरंपचायतीचा दर्जा मिळाल्याने आता नंबर दहिवडीचाच अशी चर्चा होत आहे.