शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

खिशातील धन खर्चले, तरी मिळेना मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

सातारा : शासनातर्फे सरपंचांना अत्यल्प मानधन दिले जाते, तर सदस्यांना चहा-पानासाठी देण्यात येणारा मिटिंग भत्ताही वेळेत मिळत नसल्याने खिशातील ...

सातारा : शासनातर्फे सरपंचांना अत्यल्प मानधन दिले जाते, तर सदस्यांना चहा-पानासाठी देण्यात येणारा मिटिंग भत्ताही वेळेत मिळत नसल्याने खिशातील धन खर्चले, तरी मिळेना मानधन, असे म्हणण्याची वेळ सरपंचांवर आलेली आहे.

कोरोनाच्या काळात लोकांसाठी शासनाबरोबर सरपंचांनी गावे सावरली. सर्वांचा विचार लस घेताना झाला; मात्र सरपंचांचा विचार झाला नाही. गावभर आशा, अंगणवाडी सेविकांना घेऊन सरपंच पुढे आले. रुग्णालयात नेण्याचे काम केले. गावाला धरुन जाणं मानसिक आधार देण्याचे काम सरपंचांनी केले. खिशातील पैसा काढून देऊन अनेक सामान्य कुटुंबे सावरली.

लोकांना गरज आहे, तेव्हा सरपंचांना उभे रहावे लागते. विधानसभेत आमदार काम करत असले, तरी त्यांना खालच्या कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागत असते. सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो. हे पद प्रतिष्ठेचं असलं, तरी आर्थिक परिस्थिती ज्याची चांगली आहे, त्यांना मानासाठी हा खर्च करताना काही वाटत नसले, तरी सर्वसामान्य व कष्टकरी व्यक्ती जर गावचा सरपंच, उपसरपंच, सदस्य झाला, तर त्यांची मात्र आर्थिक ओढाताण होते. त्यामुळे ‘घरचं झालं थोडं अन व्याह्यानं धाडलं घोडं’, असं म्हणण्याची वेळ या लोकांवर येत असते. अनेकांची परिस्थिती वाईट असते. स्वत:च्या खिशातील पैसे घालून पंचायत समिती, जिल्हा परिषदेत खेटे घालावे लागत असतात, अशी व्यथा सरपंच व्यक्त करत आहेत.

सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना जाहीर केलेले मानधन किंवा मिटिंग भत्ते वेळेत मिळत नसल्याचेही चित्र आहे. हातातील कामे सोडून त्यांना गावची सेवा करावी लागत असली, तरीदेखील त्यांना आर्थिक पाठबळदेखील शासनाने करावे, अशी मागणी आहे. शासनाने लोकसंख्येचा विचार न करता सरसकट १० हजार रुपये मानधन सरपंचांना द्यावं, अशी मागणी आहे.

कोट..

सरपंचांना मिटिंग भत्ता वेगळा मिळत नाही. तसेच जे मानधन मिळते, तेही वेळेत मिळत नाही. सदस्यांचा मिटिंग भत्ता ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून द्यायचा आहे. घरफळा सर्वच जमा होत नाही. जनतेच्या सेवेसाठी रात्री ११ ला फोन आला, तरी जायला लागते. २४ तास ऑनड्युटी असे हे काम आहे.

- वैशाली संग्राम मोकाशी, लोकनियुक्त सरपंच

कोट...

सरपंचांना कमीत कमी १० हजार रुपये मानधन हवे. लोकसंख्येच्या आधारावर मानधन देणे चुकीचे आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या सरपंचांना अनंत अडचणी येतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या काळात सरपंचांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जीव तोडून काम केले आहे. शासनाने सरपंचांना मानधन वाढवून दिले पाहिजे.

- राजेंद्र पाटील, सरपंच, कोयना वसाहत

कोट..

सरपंचांना मिळणारे मानधन पुरेसे नाही. सरपंचांना स्वखर्चातूनच अनेकदा ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त प्रवास करावा लागतो. सरपंच परिषदेतर्फे मानधन वाढीची मागणी केली होती. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत कामानिमित्त जावे लागते. दुर्गम भागातील सरपंचांना तर मोठा आर्थिक ताण सोसावा लागत आहे.

- शीतल देशमुख, सरपंच, सिध्देश्वर, कुरोली

फोटो नेम : 24वैशाली मोकाशी, २४ राजेंद्र पाटील, २४ शीतल देशमुख