शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

खिशातील धन खर्चले, तरी मिळेना मानधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

सातारा : शासनातर्फे सरपंचांना अत्यल्प मानधन दिले जाते, तर सदस्यांना चहा-पानासाठी देण्यात येणारा मिटिंग भत्ताही वेळेत मिळत नसल्याने खिशातील ...

सातारा : शासनातर्फे सरपंचांना अत्यल्प मानधन दिले जाते, तर सदस्यांना चहा-पानासाठी देण्यात येणारा मिटिंग भत्ताही वेळेत मिळत नसल्याने खिशातील धन खर्चले, तरी मिळेना मानधन, असे म्हणण्याची वेळ सरपंचांवर आलेली आहे.

कोरोनाच्या काळात लोकांसाठी शासनाबरोबर सरपंचांनी गावे सावरली. सर्वांचा विचार लस घेताना झाला; मात्र सरपंचांचा विचार झाला नाही. गावभर आशा, अंगणवाडी सेविकांना घेऊन सरपंच पुढे आले. रुग्णालयात नेण्याचे काम केले. गावाला धरुन जाणं मानसिक आधार देण्याचे काम सरपंचांनी केले. खिशातील पैसा काढून देऊन अनेक सामान्य कुटुंबे सावरली.

लोकांना गरज आहे, तेव्हा सरपंचांना उभे रहावे लागते. विधानसभेत आमदार काम करत असले, तरी त्यांना खालच्या कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागत असते. सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो. हे पद प्रतिष्ठेचं असलं, तरी आर्थिक परिस्थिती ज्याची चांगली आहे, त्यांना मानासाठी हा खर्च करताना काही वाटत नसले, तरी सर्वसामान्य व कष्टकरी व्यक्ती जर गावचा सरपंच, उपसरपंच, सदस्य झाला, तर त्यांची मात्र आर्थिक ओढाताण होते. त्यामुळे ‘घरचं झालं थोडं अन व्याह्यानं धाडलं घोडं’, असं म्हणण्याची वेळ या लोकांवर येत असते. अनेकांची परिस्थिती वाईट असते. स्वत:च्या खिशातील पैसे घालून पंचायत समिती, जिल्हा परिषदेत खेटे घालावे लागत असतात, अशी व्यथा सरपंच व्यक्त करत आहेत.

सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना जाहीर केलेले मानधन किंवा मिटिंग भत्ते वेळेत मिळत नसल्याचेही चित्र आहे. हातातील कामे सोडून त्यांना गावची सेवा करावी लागत असली, तरीदेखील त्यांना आर्थिक पाठबळदेखील शासनाने करावे, अशी मागणी आहे. शासनाने लोकसंख्येचा विचार न करता सरसकट १० हजार रुपये मानधन सरपंचांना द्यावं, अशी मागणी आहे.

कोट..

सरपंचांना मिटिंग भत्ता वेगळा मिळत नाही. तसेच जे मानधन मिळते, तेही वेळेत मिळत नाही. सदस्यांचा मिटिंग भत्ता ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून द्यायचा आहे. घरफळा सर्वच जमा होत नाही. जनतेच्या सेवेसाठी रात्री ११ ला फोन आला, तरी जायला लागते. २४ तास ऑनड्युटी असे हे काम आहे.

- वैशाली संग्राम मोकाशी, लोकनियुक्त सरपंच

कोट...

सरपंचांना कमीत कमी १० हजार रुपये मानधन हवे. लोकसंख्येच्या आधारावर मानधन देणे चुकीचे आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या सरपंचांना अनंत अडचणी येतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाच्या काळात सरपंचांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जीव तोडून काम केले आहे. शासनाने सरपंचांना मानधन वाढवून दिले पाहिजे.

- राजेंद्र पाटील, सरपंच, कोयना वसाहत

कोट..

सरपंचांना मिळणारे मानधन पुरेसे नाही. सरपंचांना स्वखर्चातूनच अनेकदा ग्रामपंचायतीच्या कामानिमित्त प्रवास करावा लागतो. सरपंच परिषदेतर्फे मानधन वाढीची मागणी केली होती. पंचायत समिती, जिल्हा परिषदेत कामानिमित्त जावे लागते. दुर्गम भागातील सरपंचांना तर मोठा आर्थिक ताण सोसावा लागत आहे.

- शीतल देशमुख, सरपंच, सिध्देश्वर, कुरोली

फोटो नेम : 24वैशाली मोकाशी, २४ राजेंद्र पाटील, २४ शीतल देशमुख