शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

डाेस वाया जाऊ नये म्हणून दहाजणांचे नियोजन सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे ...

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे डोस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभाग दहा जणांचे नियोजन करून त्यांना लस देत आहे. त्यामुळे बाटलीमध्ये लस उरत नसल्यामुळे वाया तर जात नाहीच शिवाय लस भरतानाही ती वाय जाऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे अद्यापर्यंत जिल्ह्यात लस वाया गेली नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात पहिल्या दिवशी ९०० जणांना लस देण्यात आली. काहीजणांना वेळेअभावी लस देता आली नाही. अशा लोकांना दुसऱ्या दिवशी लस देण्यात आली. लस वाय जाऊ नये म्हणून दहा-दहा जणांचा ग्रुप तयार करण्यात आलाय. त्यानंतर एकाला जरी लस द्यायची असेल तर मग दुसऱ्या दिवशी त्याला बोलावले जाते. जेणेकरून लस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. लाभार्थ्याला मेसेज जाण्यासाठी तांत्रिक बिघाड होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डाेस वेस्टेज जातात.

घाबरू नका

लस दिल्यानंतर किरकोळ ताप येणे, उलट्या मळमळ असे प्रकार होत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. लसची रिॲक्शन होत नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त रहावे.

गत काही दिवसांपासून जवळपास १२००० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलीय. एकाही कर्मचाऱ्याला त्रास झाला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.