शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST

खटाव : बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. खटाव ...

खटाव : बदलत्या हवामानामुळे कांदा रोपांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खटाव तालुक्यात मध्यंतरी सतत पडलेले ढगाळ वातावरण तसेच सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे उन्हाळी कांदा रोपांवर करपा, टाका, व्होपा आदी रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडून वाळत चालली आहेत. पिके वाचविण्यासाठी सध्या शेतकरी बाजारात उपलब्ध विविध महागड्या औषधांची फवारणी करत आहेत.

गेल्यावर्षी बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे पुरेशा प्रमाणात कांदा बियाणांचे उत्पादन झाले नव्हते. त्यामुळे कांदा बियाणांची टंचाई सुरुवातीला जाणवू लागली होती. त्यामुळे कांद्याच्या बियाणांचे दर गगनाला भिडले होते, अशाही परिस्थितीत मिळेल तेथून बी खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक सकाळी पडणारे धुके व धुक्यामुळे पडणारे दव यामुळे कांद्याच्या रोपांचे शेंडे पिवळे पडून रोपे करपा रोगाला बळी पडली आहेत. आधीच रोपाची कमतरता, त्यामुळे रोपाअभावी कांदा लागवडीची अनिश्चितता, त्यातच कांदा लागणीसाठी झालेला भांडवली खर्च वाया जाणार याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. कांदा उत्पादक शेतकरी सध्या बदलत्या हवामानामुळे चिंतित आहे. पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार याची धास्ती शेतकऱ्याला सतावत आहे.

चौकट..

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका...

सध्या कांद्याला बाजारात बऱ्यापैकी भाव सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कांद्यावर करपा रोगाचे आगमन शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके वाचविण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा व महागडे कीटकनाशके तसेच बुरशीनाशकाची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे.

(कोट)

कांदा पीक परतीच्या पावसामुळे आर्थिक फटका देऊन गेला. त्यामुळे कांद्याचा सध्याचा भाव पाहता यातून थोडीफार आर्थिक हालचाल होईल, अशी आशा होती; परंतु ऐनवेळी करपा रोगामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे. कृषी विभागाच्या वतीने भेटी देऊन शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्यात.

-विलास जगदाळे, कांदा उत्पादक शेतकरी, खटाव

17खटाव

कॅप्शन : खटाव तालुक्यात हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या करपा रोगामुळे कांद्याची रोपे पिवळी पडली आहेत.