शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हरिहरेश्वर बँकेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

सातारा : वाई येथील हरिहरेश्वर बँकेच्या वाई, भुईंज, खंडाळा व वडूज शाखेत ठेवी ठेवलेल्या असंख्य ठेवीदारांची व खातेदारांची कोट्यावधी ...

सातारा : वाई येथील हरिहरेश्वर बँकेच्या वाई, भुईंज, खंडाळा व वडूज शाखेत ठेवी ठेवलेल्या असंख्य ठेवीदारांची व खातेदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधकांच्या लेखापरीक्षणावरुन सिध्द झाले असून हरिहरेश्वर बँकेवर व घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा करावा असे पत्र विशेष लेखापरीक्षक वर्ग एक यांना दिले आहे.

गेल्या दीड वर्षापासून बँकेच्या ठेवीदारांना त्यांनी बँकेत ठेवलेल्या ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक वेळा बँकेचे अध्य़क्ष व संचालक मंडळाचे उंबरे झिजवले मात्र, बँकेचे ठराविक असलेले संचालक आजतागायत उडवाउडवीची उत्तरे देत होते.

वाईतील हरिहरेश्वर बँकेत झालेल्या धक्कादायक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी व ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी बँकेचे वाई, भुईंज, खंडाळा व वडूज येथील हजारो ठेवीदारांनी सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाव्दारे विनंती केली होती.

त्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी हरिहरेश्वर बँकेचे लेखापरीक्षण करुन अहवाल मागविला होता. त्यानुसार हरिहरेश्वर बँकेचे लेखापरीक्षण होऊन बँकेचा चाचणी परीक्षण अहवाल व त्याबरोबर विनिर्दिष्ट अहवाल सादर केला आहे. सदर अहवालाचे उपनिबंधकांनी अवलोकन केले असता बँकेच्या आर्थिक निधीचा गैरविनियोग करण्यासाठी बनावट कागदपत्रे व दस्तऐवज करुन एकाने ६१ लोकांच्या नावे व दुसऱ्याने सुमारे ७२ लोकांचे नावे कर्ज काढून सुमारे ३७ कोटी ४० लाखांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांनी बँकेच्या आर्थिक निधीचा वापर स्वतःच्या हिताकरिता करुन व अपहार केला असल्याचे निर्दशनास आले आहे.

त्या अनुषंगाने बँकेच्या पैशाचा गैरवापर केलेल्या

बँकेच्या संबंधितांवर महाराष्ट्र संस्था अधिनियम अन्वये गैरव्यवहाराचा माहिती अहवाल दाखल करुन कायद्यातील तरतुदीस अनुसरुन तत्काळ कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करावा असे पत्र उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी विजय सावंत, जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग १) सहकारी संस्था सातारा यांना दिले आहे.

कोट

कोणत्याही ठेवीदाराचा पैसा बुडणार नाही

हरिहरेश्वर बँकेचा झालेला गैरव्यवहार पाहता बँकेवर कारवाई होणार आहे. त्यानंतर त्या बँकेच्या व्यवहारासंबंधी सुनावणी होईल,ती झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर ९० दिवसात बँकेला ठेवीदारांच्या ठेवी द्याव्या लागतील. या कारणामुळे कोणाचे पैसे बुडणार नाहीत. फक्त वेळेला कोणालाही मिळणार नाहीत. याला एक वर्षाचाही किंवा

त्यापेक्षा जास्तही कालावधी लागू शकतो.

प्रकाश अष्टेकर, जिल्हा उपनिबंधक सातारा