शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला नव्या दमाच्या लोकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:51 IST

सातारा : ‘आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नव्या दमाच्या लोकांना काँग्रेस संधी देईल. महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असला ...

सातारा : ‘आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नव्या दमाच्या लोकांना काँग्रेस संधी देईल. महाराष्ट्रात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असला तरीदेखील साताऱ्यात चांगले वातावरण तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

येथील काँग्रेस कमिटीत नूतन कार्यकारिणी सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अ‍ॅड. विजयराव कणसे, हिंदुराव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश फाळके, जयवंतराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील-उंडाळकर, रजनी पवार, मनोजकुमार तपासे, प्रतापराव देशमुख, बाबासाहेब कदम, भीमराव पाटील, नंदाभाऊ जाधव, जयवंतराव केंजळे आदी उपस्थित होते.

आ. चव्हाण पुढे म्हणाले, मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू आहे. काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी हे कायदे आणले असून, त्याविरोधात लवकरच सातारा जिल्ह्यात शेतीविषयक कायद्यांसाठी शिबिरे घेण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तालुका आणि जिल्हा परिषद गटनिहाय बैठका सुरू करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गावागावांत भेटीगाठी वाढवा आता अख्खा जिल्हा ढवळून काढायचा आहे. लोकांपर्यंत पोहोचा म्हणजे मनपरिवर्तन होईल आणि काँग्रेसला सुगीचे दिवस येतील, असेही ते म्हणाले.

डॉ. सुरेश जाधव म्हणाले, सातारा जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी नवीन पदाधिकारी नियुक्तीमुळे काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. जुन्या आणि नवीन अनेकांना या कार्यकारिणीवर संधी देण्यात आली असून, त्याचा काँग्रेस पक्षासाठी नक्कीच फायदा होईल. आगामी सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागूयात आणि लढा जिंकूयात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

चौकट..

१०० जणांची टीम सज्ज करणार

सातारा काँग्रेस कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. आता ४९ जणांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, काही दिवसांत तालुकाध्यक्ष, सेवादल अशा नियुक्त्यांकडून १०० जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन येतील. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांत जास्त यश मिळवले जाईल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

चौकट..

गारपीटग्रस्तांना सरकार मदत करेल

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. पक्षांच्या नेत्यांशी बोलून मंत्रिमंडळ बैठकीत सरकारला याबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेस आग्रह धरेल, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

फोटो ओळ : सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये शुक्रवारी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.