शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 12:56 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.

ठळक मुद्देअवकाळीमुळे दीड लाख शेतकऱ्यांना अवकळापंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

नितीन काळेलसातारा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा पुरता कोलमडला असून, याचा फटका जवळपास दीड लाखजणांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलाय. तर पंचनाम्यानुसार सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी हे माण, फलटण आणि खटाव या तालुक्यांतीलच आहेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती होती. जूनपासून आॅक्टोबरपर्यंत दुष्काळी तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नव्हता. तर पश्चिमेकडेही पर्जन्यमान कमी राहिलेले. तसेच गेल्यावर्षी दीडशेहून अधिक गावे आणि एक हजारच्या वर वाड्यावस्त्यांवरील लोकांना पाणी पुरविण्यासाठी टँकर धुरळा उडवत होते.

गेल्यावर्षी दुष्काळी तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या पदरी पडला नव्हता. तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळाचा चांगलाच फटका बसलेला. मात्र, यावर्षी ही स्थिती बदलली. सुकाऐवजी सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ निर्माण झाल्याची भावना शेतकºयांची झालीय. त्यामुळे जिल्ह्यातीलच शेतकरी कोलमडून पडलाय.आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाचा विविध पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १४५० हून अधिक गावांतील शेतकरी अवकाळीच्या फेऱ्यात सापडलेत. शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील मिळून ५६ हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बाधित शेतकऱ्यांचा आकडा हा १ लाख ४६ हजार ५९२ आहे. अवकाळी पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असलेतरी अजूनही काही शेतकरी हे नुकसानीचे अर्ज भरून देत आहेत.पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार सर्वाधिक नुकसानग्रस्त क्षेत्र हे फलटण तालुक्यात १५ हजार ५६६ हेक्टर असल्याचे दिसून आले आहे. तर त्यानंतर माण तालुक्यात १० हजार ४२८, खटावमध्ये १० हजार १३० हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसलाय. तसेच सातारा तालुक्यात ४ हजार ८८८, खंडाळा ४ हजार ६२३, कोरेगाव ३ हजार ६३५, पाटण २ हजार ९९९, कऱ्हाड १ हजार ४४४, महाबळेश्वर १ हजार ३५३, वाई १ हजार २८८ आणि जावळी तालुक्यातील बाधित क्षेत्र हे ५८५ हेक्टर इतके राहिले आहे. नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण केले आहेत.जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पीक हे सोयाबीनचे आहे. त्या खालोखाल भात, भुईमूग, ज्वारी, घेवडा आदीचे आहे. तसेच माण, फलटण, खटाव आणि कोरेगावमधील द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. खरीपबरोबरच रब्बी हंगामात पेरणी केलेल्या ज्वारीच्यालाही फटका बसला असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे.बाधित शेतकरी संख्या अशी...जिल्ह्यातील अवकाळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक फलटण तालुक्यात ३८ हजार ४८० इतकी आहे. त्यानंतर खटाव २२ हजार ५९, माण तालुक्यात १८ हजार ४३९, सातारा तालुका १७ हजार ९४०, खंडाळा १३ हजार ९३०, पाटण १२ हजार ३३२, कऱ्हाड ६ हजार ४६१, महाबळेश्वर ५ हजार ६९, जावळी तालुका ४ हजार ८४२, कोरेगाव ३ हजार ५९३ आणि वाई ३ हजार ४४७ असा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरfloodपूर