शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:15 IST

मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत.

दीपक शिंदेमाय मरो आणि मावशी जगो... अशी आपल्याकडे पुरातन म्हण आहे. आई जेवढी काळजी घेते त्याच्यापेक्षा अधिक काळजी मावशी घेते. त्यामुळे एखाद्या संकटात आईची साथ सुटली तरी मावशीचा आधार मोलाचा ठरत असतो. अशीच काहीशी अवस्था बंडखोर शिवसैनिकांची झाली आहे. मातृसंस्था असलेल्या शिवसेनेला सोडून भाजपच्या जवळ गेलेल्या या शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी घेतलेली ही भूमिका कोणालाच पटलेली नाही. आई सोबत असताना मावशीशी जवळीक करणाऱ्या या नेत्यांनी पूतनामावशीशी तर जवळीक केली नाही ना, अशी शंकादेखील व्यक्त केली जात आहे. हिंदुत्वाचा विषय म्हणून बाजूला जाणाऱ्या नेत्यांनी आत्तापर्यंत हिंदुत्वासाठी काय केले. महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी तर याचे उत्तर नक्कीच दिले पाहिजे.आमच्या मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत. पदाला चिकटून बसायचे, त्या पदाचा मान, सन्मान मिळवायचा आणि आम्हाला काहीच करता आले नाही असे म्हणायचे म्हणजे आपली हतबलता स्पष्ट करण्यासारखे आहे. आपल्याला संधी देऊनही काहीच जमले नाही असा तर त्याचा अर्थ होत नाही ना....

शंभूराज देसाई असोत किंवा महेश शिंदे या दोन्ही आमदारांनी कधीही शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न केला नाही, असे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत आणि उघडपणे देखील सांगत आहेत. उलट त्यांनी आपला गट तयार केला. कधीही बाहेर पडावे लागले तर अडचणी वाढायला नकोत यासाठी त्यांनी या गटाच्या माध्यमातून आपली ताकद वाढविण्यासाठीच कायम प्रयत्न केले. त्यामुळेच आज त्यांच्यासोबतचे गट शिवसेनेच्या विरोधात बाहेर पडले आहेत. मूळ शिवसैनिक हा कधीही पक्ष सोडून इतर कोणाच्या सोबत जाणार नाही. त्याची बांधिलकी ही पक्षाशीच कायम राहणार. त्यामुळे शिवसेनेला कितीही हादरे बसले आणि कितीही नेते बाहेर पडले तरी शिवसेना मजबूत राहिली आणि राज्यात सत्तेवर देखील आली.शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाला राज्यात आपले सरकार बनविता येणार नाही, एवढी ताकद शिवसेनेने निर्माण केली आहे. याला एक पिढी द्यावी लागली आहे. त्या पिढीने शिवसेना मजबूत बांधली असली तरी बाह्यशक्ती या कायम त्रासदायकच ठरत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम प्रत्येक पिढीला करावे लागते. अन्यथा, थोडे जरी कमी पडलो तरी अशी अवस्था होते.उद्धव ठाकरे हे आपल्याच पक्षातील नेत्यांना वेळ देण्यात कमी पडले असतील ही बाब मान्य करायला हरकत नाही. बराच काळ ते आजारी असल्यामुळे ही गोष्ट गृहीतच धरली आहे. तरीदेखील राज्यमंत्री म्हणून संधी देऊन पाच मंत्रिपदे देऊन काहीच करता आले नाही, अशी जर अगतिकता व्यक्त करणार असाल तर ती कोणीच ऐकून घेणार नाही. जे लोक आपल्या मतदारसंघात कामे करता आली नाहीत असे म्हणत आहेत, त्यांच्या मतदारसंघात ५० काय अडीचशे कोटींची कामे झाली आहेत. हे पैसे कोठून आणले याचाही जाब लोक विचारणार आहेत.कोरेगावसाठी ४० कोटीची योजना मंजूर, विशेष निधीतून कोरेगावसाठी १५ कोटी, कोरेगावातील २५ गावांना पाच कोटी, कोरेगाव मतदारसंघात जलसंधारणासाठी ३७ कोटी, जलसंधारणासाठी साडेतीन कोटी ही महेश शिंदे यांची पोस्टरबाजी आहे. जर मतदारासंघासाठी निधीच मिळत नाही म्हणता तर मग ही कामे कोठून आणली. कशातून पैसे खर्च करण्याचे नियोजन केले. अशीच परिस्थिती शंभूराज देसाई यांची आहे. दर दहा पावलांवर यांच्या विकासकामांचे बोर्ड लावून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची सवय लागली आहे की काय, असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

दोन्ही नेत्यांनी सेना शाखांची माहिती द्यावी

शिवसेनेसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटना कशी वाढवायची आणि त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव आहे. पण, ज्यांनी एकही शाखा काढली नाही, शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, ते आम्ही अजूनही शिवसेनेत आणि शिवसेनेचे असल्याचे म्हणत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ