शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

माणमध्ये ३४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST

दहिवडी : ‘माणमध्ये निवडणूक झालेल्या एकसष्टपैकी चौतीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला भरभरून साथ दिली आहे,’ असे ...

दहिवडी : ‘माणमध्ये निवडणूक झालेल्या एकसष्टपैकी चौतीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला भरभरून साथ दिली आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशमुख म्हणाले, ‘माणमधील निवडणूक लागलेल्या ६१ पैकी चौदा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न केले. त्यामुळे या चौदापैकी दहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळविले. बिनविरोध झालेल्या इंजबाव, गंगोती, जाशी, तोंडले, भाटकी, मार्डी, मोही, लोधवडे, वाकी व हवालदारवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आहेत, तर निवडणूक झालेल्या ४७ पैकी २४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. काळचौंडी, किरकसाल, कुकुडवाड, खडकी, गटेवाडी, गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, जांभुळणी, डंगिरेवाडी, दिवडी, देवापूर, धामणी, पळसावडे, पानवण, पिंगळी बुद्रुक, भालवडी, रांजणी, वडजल, वर-म्हसवड, शिंदी खुर्द, शिंदी बुद्रुक, शिरवली व शेनवडी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन वर्चस्व मिळविले आहे. माणमधील सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून साथ दिली व मतरूपी आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्व मतदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभारी आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच गावोगावी विकास योजना राबवून मतदारांचा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू, असा विश्वास व्यक्त केला.