शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

माणमध्ये सर्वाधिक विंधनविहिरी

By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST

दुष्काळावर मात : खटाव तालुक्यातून मागणीच नाही

सातारा : सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग हा दुष्काळी असून, दरवर्षीच पाण्याची टंचाई भेडसावते. यावर्षीही पाण्याची टंचाई असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा होण्यासाठी बोअरवेलची मागणी ग्रामपंचायतीतून होते. यावर्षी टंचाईग्रस्तमधून ३७ विंधनविहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ३२ मारल्या असून, त्यातील ३० विंधनविहिरींना पाणी लागले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात सर्वात जास्त विंधनविहिरींची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे एक तर भाड्याची सात विंधन यंत्रे आहेत.सातारा जिल्ह्यात नेहमीच माण, खटाव, कोरेगाव, फलटण या पूर्व भागातील तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवते. पश्चिम भागातील सातारा, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे डोंगरी तालुके असून, या तालुक्यांमध्येही उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.प्रामुख्याने पूर्व भागातील तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी विंधन विहिरींचीही मागणी होती. टंचाईच्या आराखड्यातून ग्रामपंचायतीकडून मागणी पंचायत समितीकडे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या तीन भूवैज्ञानिकांकडून मागणी केलेल्या गावामध्ये प्रस्तावित जागेची पाहणी करून पाणी आहे किंवा नाही, याची तपासणी यंत्रणेद्वारे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडून विंधनविहिरीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर बोअरवेल मारण्यात येते, असे यांत्रिकी विभागातून सांगण्यात आले. यावर्षी सर्वात जास्त माणमधून बोअरवेलची मागणी झाली आणि मंजुरीही मिळाली. एकट्या माण तालुक्यात मारलेल्या २१ बोअरवेलपैकी १८ बोअरवेलला पाणी लागले असून, तीन बोअरवेल अयशस्वी झाल्या. खटाव तालुक्यात एकही बोअरवेलची मागणी झाली नाही. मारलेल्या ३२ बोअरवेलपैकी केवळ तीन बोअरवेल अयशस्वी ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)बोअरवेलची सध्य स्थिती--तालुकामंजूर बोअरवेल मारलेल्या बोअरवेल

माण २६ २१कोरेगाव १ १फलटण ८ ८पाटण २ २