शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल न मिळाल्याने मासिक सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

नगराध्यक्ष रोहिणी शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जनशक्ती विकास आघाडीचे नेत राजेंद्र यादव यांनी सभेला सुरुवात होताच, सभेत काय बोलायचे, ...

नगराध्यक्ष रोहिणी शिंदे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. जनशक्ती विकास आघाडीचे नेत राजेंद्र यादव यांनी सभेला सुरुवात होताच, सभेत काय बोलायचे, कोणता विषय आहे, तो कोण मांडणार याबाबत सत्ताधारी असूनही आम्ही अनभिज्ञ आहोत. त्यामुळे सभा तहकूब करावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेला भाजपसह लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी समर्थन देत कार्यालयीन अहवाल मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे सभा तहकूब झाली. त्यापूर्वी कारंजे व कार्वे नाका येथे सीसीटीव्हीची कामे सुरू करण्यासाठी कार्योत्तर मंजुरी देण्याचेही बैठकीत ठरले. सभेत ११६ विषय असल्यामुळे सभा उशिरापर्यंत चालेल, अशी अपेक्षा होता. मात्र प्रत्यक्षात सभा सुरू होताच सभेतील विषयांचा कार्यालयीन अहवाल मिळाला नसल्याचा आक्षेप नोंदवत जनशक्ती आघाडी आक्रमक झाली.

गटनेते राजेंद्र यादव यांनी आक्रमक भूमिका मांडत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘आत्ता सभेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. तरीही त्या सभेतील विषयांचा कार्यालयीन अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अत्यंत ढिसाळ काम सुरू आहे. सभेत विषय काय मांडायचा, कोणत्या विषयावर काय चर्चा करायची, याचे ज्ञानच आम्हाला नाही. सत्ताधारी असूनही ही अवस्था आहे त्यामुळे आजची सभा तहकूब करावी’ अशी मागणी राजेंद्र यादव यांनी केले. त्यांच्या म्हणण्याला भाजपनेही समर्थन दिले. कार्यालयीन अहवाल मिळत नसल्याचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांनी उपस्थित केला. त्याचवेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनाही असा अहवाल मिळालेला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे गोंधळ उडाला. यावेळी आरोग्य सभापती वाटेगावकर यांनी अहवालच नाही, तर सभा निघालीच कशी, तीही प्रथा बंद करावी. कार्यालयीन अहवाल मिळत नाही. तोपर्यंत सभा काढूच नये, अशी भूमिका मांडली.

मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी खुलासा करावा, असा आग्रह केला. डाके यांनीही यापुढे कार्यालयील अहवाल वेळेत मिळतील, असे स्पष्ट केले. कार्यालयीन अहवाल नसल्यानेच सभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली. पुन्हा सोमवारी सभा होईल.

- चौकट

यादव-पावसकर यांच्यात खडाजंगी

शहरातील विविध ठिकाणी कारंजे होणार आहेत. मग प्रीतिसंगम बागेतील कारंजे का सुरू होत नाहीत, असा प्रश्न ज्येष्ठ नगरसवेक विनायक पावसकर यांनी सभागृहात केला. त्यावरून गटनेते राजेंद्र यादव व पावसकर यांच्यात खडाजंगी झाली. तो विषय घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे, भाजप म्हणून तुम्ही तो विषय का घेत नाही, असे एकमेकांवर त्यांनी आरोप केले. त्यामुळे आगामी काळात प्रीतिसंगम बागेतील कारंजावरून राजकीय फवारे निश्चित उडणार हेही स्पष्ट झाले.