शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

सातर गावात जगणं महाग, मरण स्वस्त!

By admin | Updated: February 10, 2015 00:25 IST

पाटण तालुका : रस्ता, स्मशानभूमी, वैद्यकीय सेवांची कमतरता; पाण्यासाठी रोजचीच पायपीट

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या एका टोकाला डोंगरदऱ्यात वसलेले पाटण तालुक्यातील सातर हे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावाअंतर्गत महाळुंगेवाडी, लखनवस्ती, धनगरवाडा, सुतारवाडा या वस्त्यांचा समावेश असून, या वाड्या अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या वस्त्यांना विकास कशाला म्हणतात, याची अद्याप जाणीवच नाही. येथील लोक अद्यापही आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. या गावाला पुढाऱ्यांनी निवडणुकीत फक्त आश्वासने दिली. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही शून्य असल्याचे दिसते.सातर गावात जाण्यासाठी रस्ता नाही. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही. शाळेच्या इमारतीची गैरसोय. जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. अशा एक नव्हे, तर अनेक सुविधांचा वानवा आहे. त्यामुळे येथील लोकांना जगणं महाग झालंय. स्मशानभूमी नसल्याने मृत्यूनंतरही मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. गावात स्मशानभूमी नसल्याने आपल्या शेतातच अंत्यसंस्कार करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, शेड बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी निधी देत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाली तर अंत्यसंस्कारासाठी पाऊस जाईपर्यंत ताटकळत बसावे लागते. विधीपूर्ण होऊपर्यंत त्याचठिकाणी थांबावे लागते. गावात दळणवळणाची मोठी गैरसोय आहे. येण्या-जाण्यासाठी वाहतूक नसल्याने पाच ते सात किलोमीटर पायी चालतच प्रवास करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी आजही डोलीचा वापर करावा लागतो. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. मात्र, शाळेसाठी पुरेशी इमारत नाही. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. तसेच वर्षानुवर्षे भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. पिण्याचे पाणी ग्रॅव्हिटीद्वारे डोंगरातून पाईपलाईन करून गावात आणण्यात आले आहे. मात्र डोंगरात चरावयास गेलेल्या जनावरांमुळे पाईपलाईन सारखी फुटत असते. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याचे प्रकार घडतात. उन्हाळ्यात पिण्यासाठी लोकांना रात्रंदिवस डोंगर दऱ्यात भटकावे लागत असते. त्यातच जंगली जनावरांचा वाढता त्रासामुळे लोक हैराण होत आहेत. (वार्ताहर)नेत्यांची आश्वासने निवडणुकापुरतेचदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटून गेली. मात्र, आम्ही अजूनही पारतंत्र्यातच आहे. आम्ही आजही आदिवासींसारखे जीवन जगत आहे. गावात अनेक सुविधांचा वानवा आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीवेळीच मतासाठी गावात येतात, आश्वासने देतात; मात्र निवडणूक झाली की त्यांना त्याचा विसर पडतो. - अंकुश साळुंखे, माजी सरपंच, सातर