शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
3
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
4
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
5
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
6
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
7
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
8
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
9
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
10
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
11
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!; पूरस्थिती टाळण्याची सूचना, पालकमंत्र्यांकडून आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:47 IST

७३ टीएमसी साठ्याला दरवाजाला पाणी..

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार असल्याने पाणीसाठा ७० टीएमसीजवळ पोहोचला आहे. यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार दिवसांतच धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करावा लागणार आहे. परिणामी, कोयना नदीची पाणी पातळीही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही आढावा घेऊन सांगली व कोल्हापूरच्या कृष्णाकाठाची पूरस्थिती टाळण्यासाठी विसर्गाचे नियोजन करावे, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाला सोमवारी दिली.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणातील साठाही वेगाने वाढू लागला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास धरणात ६९.०४ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यातच सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत.

कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीजवळ पोहोचल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोयना धरणातील पाणी पातळी, पाऊस यांचा प्रशासनाकडून सोमवारी आढावा घेतला. तसेच काही सूचनाही केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गावांना सतर्कतेचा इशारा द्या : शंभूराज देसाईकोयना धरणात साधारण ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पाणी विसर्गामुळे पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाणी सोडण्याचे आतापासूनच नियोजन करा, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री देसाई यांनी केली. तसेच कोयना धरणातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा. तलाठी, मंडळाधिकारी, पोलिस पाटील यांच्या बैठका घ्याव्यात. पुराच्या पाण्याचा धोका आहे, अशा गावांमध्ये उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.

७३ टीएमसी साठ्याला दरवाजाला पाणी..कोयनानगर येथे आतापर्यंत २ हजार ४३ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर धरणातील साठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. मागील काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात दररोज २ ते ३ टीएमसीने वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास गुरुवारपर्यंत धरणाच्या दरवाजातून विसर्गाची शक्यता आहे. कारण, धरणात ७३ टीएमसी पाणीसाठा झाल्यास दरवाजाला पाणी लागते, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.