शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

जल जीवन मिशनअंतर्गत कोल्हापूरची राज्यात बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका असतो. शाळा परिसरात स्वच्छतागृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने शाळेच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे राज्याच्या सर्व ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांबाहेर मुबलक पाणी देण्याचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत आत्तपर्यंत ५३ लाख ८८ हजार ४२८ ठिकाणी नळजोडणी करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वांत आधी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ अकोला आणि अहमदनगरचा क्रमांक लागतो.

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाने गांधी जयंतीपासून पुढील १०० दिवसांत ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी देऊन पिण्यासाठी, वापरासाठी आणि स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध देण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

जल जीवन मिशन अभियानात राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरांतील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे काम राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाण्याबाबत कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असून नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले होते.

या मोहिमेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी करून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १०० दिवसांच्या या मोहिमेत राज्यातील प्रत्येक गावच्या स्थितीचे सनियंत्रण राज्यस्तरावरून आणि जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.

कोट :

शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे मूळ कारण समजले जाते. मुलांसाठी अंगणवाडी आणि शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्याने २०२०-२०२१ चे ६८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी पेयजलमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

- आर. विमला, मिशन संचालक, जल जीवन मिशन, मुंबई

चौकट :

पुणे विभागातून कोल्हापूरने १ लाख २५ हजार १९४, नाशिक विभागातून अहमदनगरने २ लाख ३४ हजार ४७४, अमरावती विभागातून अकोलाने ५४ हजार ५२३, तर नागपूर विभागातून नागपूरने ९६ हजार ८६६ अंगणवाडी आणि शाळांच्या अंगणांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात औरंगाबाद आणि कोकण विभागातून अद्याप एकाही जिल्ह्यातून उद्दिष्टपूर्ती झालेली नाही.