शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

जावलीत खरिपाच्या पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता ...

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता खरीप पिकांच्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. मॉन्सूनची हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. पावसाने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

जावळी तालुक्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र १९५०० हेक्टर असून, तालुक्यामध्ये प्रामुख्याने भात ८८०० हेक्टर, नाचणी ७१५ हेक्टर, सोयाबीन ३५०० हेक्टर, भुईमूग ३००० हेक्टर व उर्वरित क्षेत्र कडधान्य मका, ज्वारी, गळीत धान्य पिकाखाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेत व वाजवी दरात खते बियाणे मिळण्याकरिता शेतकरी गटांच्या माध्यमातून आजअखेर २८३ मेट्रिक टन खते ९७८ क्विंटल बियाणांचा बांधावर पुरवठा करण्यात आलेले आहे.

दिवसेंदिवस गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक बैलजोडीच्या ऐवजी ट्रॅक्टरनेच पेरणी होताना दिसत आहे. शेतकरीही आधुनिक झाला असून, यांत्रिकीकरणाचा उपयोग करू लागला आहे. काही ठिकाणी धूळवाफेवरही पेरण्या केल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याकरिता भाताची रोपे तयार करण्याच्या कामात शेतकरी मग्न आहेत. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे ,खते यांच्या खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. या हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

(चौकट)

कृषी विभागाकडून पुरवठा व मार्गदर्शन

शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाण्याची कमतरता उगवणक्षमता तपासून चांगले असणारे बियाणे ग्राम पातळीवरच इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांना सोयाबीन व भात पिकाबाबत सर्व माहिती देण्यासाठी ग्रामपातळीवर कृषी सहायक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. फळबाग लागवड करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव घेण्यात येत आहेत.