शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू धरणबाधितांना मोबदला न दिल्यास शेतकरी जलसमाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत टेंभू धरणाच्या पाण्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास धरणात जलसमाधी घेण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े यांनी यात पुढाकार घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा नदीवर टेंभू येथे २००८ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. नदीवर धरण बांधण्यात आल्याने गोवारे, सैदापूर, मलकापूर या गावांतील शेतकऱ्यांची नदीकाठची जमीन गेल्या बारा वर्षांपासून पाण्याखाली गेली आहे. गेल्या बारा वर्षांपासून जमीन धरणाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

धरणाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकवेळा या शेतकऱ्यांनी टेंभू जलसिंचन विभागाला अर्ज, निवेदने दिली आहेत. परंतु येथील अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. गोवारे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी २०१७ मध्ये वर्तमानपत्रामध्ये कृष्णा खोरे महामंडळाने खरेदीपूर्व नोटीस दिली होती. तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली नाही.

धरणबाधित शेतकऱ्यांनी, एक तर आमची धरणाच्या पाण्यात गेलेली जमीन तरी परत दया, अन्यथा मोबदला तरी दया, अशी मागणी केली असून, यासंदर्भात येत्या सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास सहकुटुंब टेंभू धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े, राजेंद्र पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पवार, प्रफुल्ल कांबळे, शीतल पवार व गोवारे, सैदापूर येथील शेतकरी उपस्थित होते.

फोटो