शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

ग्रासरूट इनोव्हेटर : वन्यप्राण्याकडून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याची नाविन्यपूर्ण कल्पना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:11 PM

अहोरात्र काबाडकष्ट करून फुलविलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्याकडून होणारे नुकसान टाळणे महत्त्वाचे असते.

- संतोष धुमाळ (पिंपोडे बु. जि. सातारा)

अहोरात्र काबाडकष्ट करून फुलविलेल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्याकडून होणारे नुकसान टाळणे महत्त्वाचे असते. हे ओळखूनच सातारा जिल्ह्यातील सोनके (ता. कोरेगाव) येथील फत्तेसिंग धुमाळ या शेतकऱ्याने नैसर्गिक पंखा तयार केला आहे. वाऱ्यावर फिरणाऱ्या या पंख्याच्या आवाजामुळे वन्य प्राण्याकडून होणारा उपद्रव थांबला आहे.  

सोनके या गावातील प्रयोगशील शेतकरी फत्तेसिंग धुमाळ यांनी आपल्या कोरडवाहू शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. दुष्काळावर मात करीत त्यांनी आपल्या शेतीत ऊस, घेवडा व वाटाणा अशी कसदार पिके घेत फळबागही विकसित केली आहे. परंतु नैसर्गिक संकटांचा सामना करतानाच पाण्याआभावी डोंगराळ भागातील रानडुकरे, साळिंदर तसेच कोल्हे असे वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात शिवारात फिरतात. मोर, बगळे, साळुंखी हे पक्षी पिकांचे नुकसान करतात.

हे लक्षात आल्याने त्यांनी कल्पक बुद्धी वापरून आधुनिक पद्धतीचा पंखा बनविला आहे. ज्यामुळे ऊस पिकाचे नुकसान करीत असलेली रानडुकरे तसेच वाटाणा, घेवडा, भुईमूग या पिकांचे नुकसान करणारे पक्षी घाबरत आहेत. हा पंखा वाऱ्याच्या वेगाने फिरल्यानंतर त्यावर बसविलेल्या तबकडीवर जोडलेल्या एका काठीद्वारे आवाजाची निर्मिती होते. त्यामुळे येणारे प्राणी व पक्षी घाबरतात. परिणामी पिकांची हानी टळून पयार्याने पिकांचे संरक्षण होते.

या उपकरणासाठी त्यांना किरकोळ खर्च आला आहे. एका नादुरुस्त पंख्याच्या पात्याला बेअरिंगच्या साह्याने लोखंडी रॉड बसविला आहे. या रॉडच्या मागील बाजूस वेल्डिंगच्या साह्याने आणखी एक रॉड बसवून त्याच्या दोन्ही बाजूस साधारणत: दोन साखळ्या जोडल्या आहेत. त्याच्या खालच्या बाजूला एक तबकडी जोडली असून, वाऱ्याच्या साह्याने पात्यासह लोखंडी रॉड फिरल्यानंतर त्यावरील साखळ्या तबकडीवर आदळून आवाज होतो. त्यामुळे प्राणी- पक्षी घाबरतात.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी