शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

धुराच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थ एकवटले !

By admin | Updated: November 27, 2014 00:10 IST

कारंडवाडी : कारखाना बंद करण्याचा इशारा साताऱ्याचा भोपाळ नको !

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्तात कंपनीतून येणाऱ्या धुराविषयी प्रशासन व संबंधित कंपनीधारकाला कल्पना व निवेदन देऊन देखील याविषयी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. उलट याविषयी ग्रामस्थांना धमकावले जात असल्याने येथील कारंडवाडीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा कारखाना बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिली.मागील सहा महिन्यांपासून या कारखान्यातून काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर पडत आहे. कधी पांढरा धूर तर कधी काळा धूर या कंपनीतून बाहेर फेकला जात आहे. या धुरामुळे जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील वस्तीला त्रास सोसावा लागत आहे. तर विहिरीचे पाणी काजळी पडून खराब होत आहे. तर जनावरांना लावण्यात आलेला कडबा व ऊस पिकावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. या कारखान्याविरोधात गावकरी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)

धुरामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पूर्वी एकराला ऊस पन्नास टन निघत होता. आता तीस टनापर्यंत आला आहे. तर ज्वारीच्या पिकावरही रोगराई होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे, तर काही मोठी वृक्ष वटायला लागले आहेत.
-संदीप काशीद (शेतकरी)

कारखान्याचे पाणी ओढ्यात सोडल्याने गावातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विहिरींतील पाणी काजळ पडून खराब झाले आहे, तर या विहिरीतील पाणी जनावरेही पीत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- बजरंग देशमुख (कारंडवाडी, ग्रामस्थ)

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
या कारखान्यातील धूर हा कारंडवाडी, देगाव, महाडिक, वायकर, वनश्री कॉलनी, भाटवस्ती या भागात पसरत आहे. जवळपास या कारखान्याच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत हा धूर त्रासदायक ठरत आहे.
- संतोष साळुंखे (माजी सरपंच, कारंडवाडी)

धुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उसावर काजळी पडल्याने उसाची उंची खुंटली आहे व वजनही भरत नाही. तर उसामध्ये आंतरपीक घेतलेले ज्वारीचे पीक हे खास करून जनावरांना कडबा म्हणून वापरला जातो; परंतु या काजळीमुळे जनावरे कडबाही खात नाहीत. त्यामुळे आमचे उत्पन्न घटले आहे.
- आनंदराव साळुंखे (शेतकरी)

कारखान्याचा धूर आणि ओढ्यात सोडलेले पाणी यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे. ओढ्याच्या पाण्यामुळे विहिरीचे पाणीही दूषित झाले आहे. धुरामुळे रस्ताच दिसत नाही. पावसाळ्यात कारखान्याने ओढ्याचे पाणी आडविल्याने अनेक वावरे वाहून गेली, तर रस्ताही खराब झाला आहे.
-सुधीर साळुंखे (देगाव ग्रामस्थ)