शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:21 IST

वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन!पावित्र्य लयाला : वाई तालुक्यातील स्थिती; धार्मिक विधीचे साहित्यही पात्रात

वाई : वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाल्यानंतर ती वाई तालुक्यातून वाहत जाते. उगमानंतर नदीपात्रावर वाई तालुक्यातच धोम धरण आहे. सध्या वाढते प्रदूषण, अतिक्रमण, श्री क्षेत्र धोम येथे नदीपात्रात प्रवाही पाण्याची कमतरता यामुळे नदीचे सौंदर्य हरपून भयावह स्थिती झाली आहे़ तर नदीपात्रात विविध प्रकारच्या वनस्पती, शेवाळ, जलपर्णी आहे.

धार्मिक विधी करताना नदीपात्रात अर्पण केलेले नारळ, कपडे व इतर वस्तू यामुळे नदीचे पावित्र्य हरपून गेले आहे़ नदीचे पात्र जलपर्णीमुळे पूर्ण झाकून गेले आहे. या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्र जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असे दिसत आहे.नदीच्या सुरुवातीपासून स्वच्छता करण्यासाठी समूह संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र धोम येथील विविध पौराणिक घाट स्वच्छ करण्यात आले. तर पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीयुक्त झाले होते़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़, त्यावेळी धोम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये खर्च केला होता़ यावेळी प्रशासन व पर्यावरणप्रेमींच्या वतीने नदीपात्र स्वच्छता उपक्रमास जेसीबी, ट्रॅक्टर्स व इतर स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती़.या अभियानात धोम ग्रामस्थांचा सहभाग हा उल्लेखनीय होता़ यावेळी सलग दोन महिने नदी स्वच्छतेचे काम चालू होते. पाण्यातील सर्व वनस्पती व शेवाळ काढण्यात आल्याने जलाशयाने मोकळा श्वास घेतला होता़ यामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी श्रमदान करून योगदान दिले होते़. या उपक्रमास राष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख, मकरंद शेंडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते; परंतु नदीपात्रात प्रवाही पाणी येत नसल्याने पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपयोजना करावी व नदी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांनी केली आहे़.

टॅग्स :pollutionप्रदूषणSatara areaसातारा परिसर