शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:21 IST

वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन!पावित्र्य लयाला : वाई तालुक्यातील स्थिती; धार्मिक विधीचे साहित्यही पात्रात

वाई : वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाल्यानंतर ती वाई तालुक्यातून वाहत जाते. उगमानंतर नदीपात्रावर वाई तालुक्यातच धोम धरण आहे. सध्या वाढते प्रदूषण, अतिक्रमण, श्री क्षेत्र धोम येथे नदीपात्रात प्रवाही पाण्याची कमतरता यामुळे नदीचे सौंदर्य हरपून भयावह स्थिती झाली आहे़ तर नदीपात्रात विविध प्रकारच्या वनस्पती, शेवाळ, जलपर्णी आहे.

धार्मिक विधी करताना नदीपात्रात अर्पण केलेले नारळ, कपडे व इतर वस्तू यामुळे नदीचे पावित्र्य हरपून गेले आहे़ नदीचे पात्र जलपर्णीमुळे पूर्ण झाकून गेले आहे. या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्र जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असे दिसत आहे.नदीच्या सुरुवातीपासून स्वच्छता करण्यासाठी समूह संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र धोम येथील विविध पौराणिक घाट स्वच्छ करण्यात आले. तर पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीयुक्त झाले होते़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़, त्यावेळी धोम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये खर्च केला होता़ यावेळी प्रशासन व पर्यावरणप्रेमींच्या वतीने नदीपात्र स्वच्छता उपक्रमास जेसीबी, ट्रॅक्टर्स व इतर स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती़.या अभियानात धोम ग्रामस्थांचा सहभाग हा उल्लेखनीय होता़ यावेळी सलग दोन महिने नदी स्वच्छतेचे काम चालू होते. पाण्यातील सर्व वनस्पती व शेवाळ काढण्यात आल्याने जलाशयाने मोकळा श्वास घेतला होता़ यामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी श्रमदान करून योगदान दिले होते़. या उपक्रमास राष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख, मकरंद शेंडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते; परंतु नदीपात्रात प्रवाही पाणी येत नसल्याने पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपयोजना करावी व नदी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांनी केली आहे़.

टॅग्स :pollutionप्रदूषणSatara areaसातारा परिसर