शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सातारा : प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन, वाई तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:21 IST

वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रावर जलपर्णीचे आच्छादन!पावित्र्य लयाला : वाई तालुक्यातील स्थिती; धार्मिक विधीचे साहित्यही पात्रात

वाई : वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य लयाला जात आहे. यावर उपाययोजना करण्याची खरी आवश्यकता आहे.महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम झाल्यानंतर ती वाई तालुक्यातून वाहत जाते. उगमानंतर नदीपात्रावर वाई तालुक्यातच धोम धरण आहे. सध्या वाढते प्रदूषण, अतिक्रमण, श्री क्षेत्र धोम येथे नदीपात्रात प्रवाही पाण्याची कमतरता यामुळे नदीचे सौंदर्य हरपून भयावह स्थिती झाली आहे़ तर नदीपात्रात विविध प्रकारच्या वनस्पती, शेवाळ, जलपर्णी आहे.

धार्मिक विधी करताना नदीपात्रात अर्पण केलेले नारळ, कपडे व इतर वस्तू यामुळे नदीचे पावित्र्य हरपून गेले आहे़ नदीचे पात्र जलपर्णीमुळे पूर्ण झाकून गेले आहे. या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्र जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असे दिसत आहे.नदीच्या सुरुवातीपासून स्वच्छता करण्यासाठी समूह संस्था, सामाजिक संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र धोम येथील विविध पौराणिक घाट स्वच्छ करण्यात आले. तर पाणी प्रदूषित होऊन दुर्गंधीयुक्त झाले होते़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़, त्यावेळी धोम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून अडीच लाख रुपये खर्च केला होता़ यावेळी प्रशासन व पर्यावरणप्रेमींच्या वतीने नदीपात्र स्वच्छता उपक्रमास जेसीबी, ट्रॅक्टर्स व इतर स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती़.या अभियानात धोम ग्रामस्थांचा सहभाग हा उल्लेखनीय होता़ यावेळी सलग दोन महिने नदी स्वच्छतेचे काम चालू होते. पाण्यातील सर्व वनस्पती व शेवाळ काढण्यात आल्याने जलाशयाने मोकळा श्वास घेतला होता़ यामध्ये शेकडो स्वयंसेवकांनी श्रमदान करून योगदान दिले होते़. या उपक्रमास राष्ट्रीय जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, तत्कालीन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर देशमुख, मकरंद शेंडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते; परंतु नदीपात्रात प्रवाही पाणी येत नसल्याने पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपयोजना करावी व नदी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी सामाजिक संस्था व धोम ग्रामस्थांनी केली आहे़.

टॅग्स :pollutionप्रदूषणSatara areaसातारा परिसर