शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या कमी फेऱ्यामुळे वडाप जोमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST

वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन ...

वाई : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव होता. या काळात एसटी सेवा ही पूर्णपणे बंद होती. परंतु अलीकडच्या तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग कमी होऊन व्हॅक्सिनही आल्याने काही प्रमाणात एसटी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र एसटीच्या कमी फेऱ्यांमुळे ग्रामीण भागात वडाप सुसाट धावत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पास असूनही वडापचा आधार घ्यावा लागत आहे.

शासनाने २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आणि २७ जानेवारीला पाचवी ते आठवी वर्ग सुरू केल्याने मोठ्या प्रमाणावर मुले प्रवास करू लागली; परंतु अजून बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.

वाई आगारात एकूण ६५ बस असून, पैकी ५८ बस सध्या कार्यरत आहेत. काही बस दुसऱ्या आगारांकडे वर्ग केल्या आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागात यापूर्वी एकूण १८० फेऱ्या होत होत्या. परंतु आता १२० फेऱ्या सुरू असल्यामुळे मुख्य मार्गावर काही फेऱ्या सुरू केल्या असल्या तरी अनेक गावांची अजूनही बससेवा सुरू नाही. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्यामुळे खासगी वडाप मात्र तेजीत चालले आहे, त्याचा फायदा वडापवाल्यांनी पुरेपूर उठविला असून, नागरिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. चाकरमानी, शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे एसटी पासेस असताना त्यांना दररोज जादा भाड्याचा फटका सहन करावा लागत आहे. तरी शेवटच्या थांब्याच्या गावांपर्यंत एसटी बसच्या फेऱ्या त्वरित सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी, प्रवासी यांच्याकडून करण्यात येत आहे.

कोट..

सध्या तालुका, जिल्ह्याबाहेरील लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू आहेत. वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य मार्गावरील बससेवा सुरू केली आहे. अजून काही गावांना बससेवा बंद असून, टप्प्याटप्प्याने बंद फेऱ्याही चालू केल्या जातील.

-जी.एम. कोळी, वाई आगार व्यवस्थापक

फोटो....

०४वाई

वाई तालुक्यातील बहुतांश गावांना पूर्वीप्रमाणे नियमित एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे.