शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची ...

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची आग या डोंगरावर भडकली आहे. त्यामुळे ‘नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा’ असे आवाहन या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वनविभागानेही जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी वणवा लागण्याचे प्रकार घडत असताना, हे लोण आता फलटण तालुक्यातही येऊन पोहोचले आहे. दुधेबावी परिसरातील भवानी आईच्या डोंगराला गेले दोन दिवस वणवा लागलेला आहे. भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीत गवत व वनविभागाने लावलेली अनेक झाडे जाळून खाक झाली आहेत, तर अनेक मोठ्या झाडांनाही झळा बसल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गवत जळाल्याने परिसरातील येथे चरायला नेत असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे, तसेच आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी, अंडी, घरटी जळून खाक होत असल्याने, येथील वनसंपदाही नष्ट होत आहे.

त्यामुळे परिसरात वणव्याचा प्रकार लक्षात आला, तर तातडीने तो विझविण्यासाठी प्रयत्न करावेत व वनविभागाशी संपर्क साधावा. जर कुणी वणवा लावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा प्रवृत्तींना अटकाव करणे आवश्यक आहे.

हे करू नये -

१. डोंगरकपारीमध्ये स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.

२. डोंगरकपारीमध्ये बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नयेत.

३. डोंगरकपारीतील अथवा वनालगतच्या शेतातील झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.

४. रात्री डोंगरकपारीतून जाताना हातात टेंभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्याऐवजी बॅटरी घेऊन जावे.

५. डोंगरकपारीलगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.

आगीचा परिणाम असा होतो -

१. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.

२. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते.

३. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.

४. ती अशक्‍त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात.

५. पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात.

६. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते.

७. जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.

८. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.

९. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.

१०. कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.

११. विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात.

कोट-

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक त्या शेजारील असलेल्या शेतात पाचट वैगरे पेटवत असतात. त्यामुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. डोंगराजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

- मारुती निकम, परिक्षेत्र वनअधिकारी, फलटण

06कोळकी

दुधेबावी, ता.फलटण येथे भवानी आईच्या डोंगरावर वणवा लागला होता. (छाया: सतीश कर्वे)