शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वणव्याने झाडे जिवंतपणी सोसतायेत मरणयातना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास परिसराने सिनेमासृष्टीलाही भुरळ घातली आहे. सातारा-कास मार्गावरील निसर्गसौंदर्याला गेल्या कित्येक वर्षांपासून विघ्नसंतुष्टांची नजर ...

पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास परिसराने सिनेमासृष्टीलाही भुरळ घातली आहे. सातारा-कास मार्गावरील निसर्गसौंदर्याला गेल्या कित्येक वर्षांपासून विघ्नसंतुष्टांची नजर लागत आहे. वणव्यात होरपळून बुंधक्यांची परिस्थिती पाहता, झाडे जिवंतपणी मरणयातना सोसून कोणत्याहीक्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे ‘मी संपलोय... आता माझ्या बांधवांना तरी जगूद्यात’, अशी आर्त हाक या जमीनदोस्त होणाऱ्या झाडांकडून होताना दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास, बामणोलीची ओळख आहे. देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक या पर्यटनस्थळी वर्षभर भेट देत असतात. इथला गर्द, दाट हिरवागार निसर्ग नेहमीच पर्यटकांना मोहिनी घालतो. धकाधकीच्या जीवनात मनाला प्रसन्नता, शुद्ध हवा, निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बहुसंख्य पर्यटक या परिसरात पर्यटनास येतात.

येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडी-झुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा लावणाऱ्यांकडून येथील वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने निसर्गसौंदर्य लोप पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून समाजात एक चळवळ उभी राहून प्रत्येक मनुष्याने विवेकबुद्धीने जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. मरणयातना सोसणाऱ्या या झाडाची आर्त हाक तसेच त्यांच्या भावना ओळखून वणव्याच्या विरोधात समाजात जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचे संतुलन राखत असताना देखील, वणव्याने झाडांचा बुंधा आगीत धुपून आजही हे झाड आपली व्यथा कळकळीने इतरांपर्यंत पोहोचवताना केवळ नावापुरतीच तग धरून उभे आहे, ते केवळ आपल्या बांधवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच यावर घरटे करून राहणाऱ्या पाखरांसाठी!

चौकट

वणवा उठला मुळावर..

असा आम्ही काय अपराध केला, म्हणून आमच्या मुळावर उठता आहात, अशी अंत:करणापासून आपणा सर्वांना हे झाड विनवणी तर करत नसेल ना? यामुळे वणवा लागणार नाही याचा सर्वांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. तसेच लागलेला वणवा तत्काळ विझविण्यासाठी आपली माणुसकी जिवंत ठेवली गेली पाहिजे.

(कोट)

वणव्यांमुळे प्राणीसंपदा, वनसंपदा धोक्यात येऊन पर्यावरणाचा समतोल बिघडला जातो. तसेच वणव्यांमुळे कित्येक पशु-पक्ष्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन पशु-पक्ष्यांच्या अधिवासात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा विकृत घटनांवर वेळीच पायबंद घातला जाणे गरजेचे आहे. तसेच वणवा पेटविण्याची ही विघातक प्रवृत्ती थांबली गेली पाहिजे.

- निकेश पवार, पर्यावरणप्रेमी, सातारा

०८पेट्री

सातारा-कास मार्गावरील निसर्गसौंदर्याला गेल्या कित्येक वर्षांपासून विघ्नसंतुष्टांची नजर लागत आहे. लागलेल्या या वणव्यात अनेक वृक्षांसह जीवजंतूही जळून खाक झाले.