शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

दत्ताविरुद्ध तक्रार दिली म्हणून तिघांचे अपहरण

By admin | Updated: November 13, 2014 23:42 IST

गोवे येथील घटना : दोन दिवस थांगपत्ता नाही

सातारा : प्रतापसिंहनगरातील दत्ता जाधवच्या विरोधात तक्रार दिल्याच्या आरोपावरून अज्ञात दोघांनी गोवे (ता. सातारा) येथील तिघांचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली असून, पोलिसांना अपहृतांचा ठावठिकाणा न लागल्याने त्या तिघांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.वसंत बळवंत निकम (वय ४५, रा. गोवे, ता. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दि. ११ रोजी सकाळी दहा वाजता दोन मोटारसायकलवरून दोन युवक आमच्या घरात आले. संतोष बळवंत निकम, संतोष लोहार, सागर पाटेकर (सर्व रा. गोवे) या तिघांना मोटारसायकलवर बसवून त्यांनी पळवून नेले. सागर ज्ञानदेव पाटेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दत्ता जाधवच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या कारणावरूनच संबंधितांनी या तिघांचे अपहरण केले आहे. तसेच अज्ञात ठिकाणी त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे.दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ अपहरणकर्त्यांचा शोध घेतला. मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत. नेमका काय प्रकार आहे, हे सांगण्यासही पोलीस नकार देत आहेत. दोन दिवस उलटून गेले तरी अपहृत तिघांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. त्या तिघांना नेमके कोठे डांबून ठेवले आहे, हेही अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. (प्रतिनिधी)