शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘तहसील’मध्येच डेंग्यूच्या डासांची फॅक्टरी

By admin | Updated: November 28, 2014 00:15 IST

काखेत कळसा अन्... : सायकल दुकानातील टायरमधील पाणी टाकून देणाऱ्या तहसीलदारांच्या कार्यालयातच रोगाला आमंत्रण

सातारा : राज्यभर डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना जिल्हा प्रशासन डेंग्यूच्या उपाययोजनेबाबत जिल्हाभर प्रबोधन करत आहे. मात्र, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् आपण कोरडे पाषाण’ या उक्तीची प्रचिती सातारा तहसीलदार कार्यालयात येत आहे. कार्यालयाच्या आवारात घाणीचे साम्राज्य साठले आहे तर अवैध वाळू उपशाप्रकरणी जप्त केलेल्या बोटींमध्ये खराब पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. या साठलेल्या पाण्यात डासांची अंडी असल्याने भविष्यात येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सातारा तालुक्यातून विविध कामांसाठी तहसील कार्यालयात दाखल होणाऱ्या नागरिकांनाही डेंग्यूची लागण झाली, तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण राहणार नाही.
सातारा शहरासह जिल्ह्यात जागोजागी सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये फोटोसेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयाच्या आवारात साठलेली घाण दिसत नाही का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. केंद्र शासनाने एका बाजूला स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेत नागरिक हिरीरीने सहभागही घेत आहेत. सार्वजनिक स्वच्छतेचे धडे शासकीय अधिकारीही जागोजागी जाऊन देत आहेत. मात्र, आपले कार्यालय स्वच्छ करण्याची सुबुद्धी त्यांना आतापर्यंत झालेली नाही. केवळ एक दिवस रस्ता झाडून वृत्त प्रसिद्ध झाले की मोहीम थांबवायची, ही राजकारणी बुद्धी शासकीय अधिकाऱ्यांनाही सुचल्याचेच यातून दिसते. त्यामुळे आधी आपला परिसर स्वच्छ करावा, त्यानंतर लोकांना स्वच्छतेचे धडे द्यावेत, अशी कोपरखळी लोक मारत आहेत.
दरम्यान, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठातर्फे काही दिवसांपूर्वी या परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा घाणीचे साम्राज्य साठू लागले असल्याने आता पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस स्वच्छतेसाठी काढल्यास घाणीवर नियंत्रण येऊ शकते. (प्रतिनिधी)


अस्वच्छता करणाऱ्यांवर नियंत्रण अशक्य
जप्त केलेल्या बोटींतील पाणी काढले तर त्यांचे बूड खराब होण्याची शक्यता असल्यानं त्यातील पाणी काढलेले नाही. डासांचं तेल टाकून घेतलंय. कचरा कुंडी ठेवलीय तरीही लोक बाहेरच कचरा टाकतात. या परिसरात पाच ते सहा कार्यालये आहेत. या परिसरात नेहमी वर्दळ असते, त्यामुळे कोण घाण करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.
- राजेश चव्हाण, तहसीलदार