शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

घरात ठणठणाट अन् दारात पाण्याचे पाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:43 IST

सातारा : अनेक प्रयत्न करूनही सदर बझार येथील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती जीवन प्राधिकरणला थांबवता आली नाही. त्यामुळे घरात ...

सातारा : अनेक प्रयत्न करूनही सदर बझार येथील मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती जीवन प्राधिकरणला थांबवता आली नाही. त्यामुळे घरात पाण्याचा ठणठणात तर दारात पाणीचपाणी अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे.

सदर बझार परिसराला जीवन प्राधिकरणकडून कृष्णा उद्भव योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. येथील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे या भागात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. जीवन प्राधिकरणकडून दोन महिन्यांत तब्बल तीन वेळा रस्त्यात खोदकाम करून जलवाहिनीची गळती थांबविण्यात आली. मात्र, काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होत आहे. तीनच दिवसांपूर्वी प्राधिकरणकडून गळती काढण्यात आली. मात्र, दुस-या दिवशी रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

परिसरातील नाले व गटारातील सांडपाणी पिण्याच्या पाण्याच मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर बनू लागला आहे. त्यामुळे सातत्याने खोदकाम करून वेळ व पैसा वाया घालवण्याऐवजी जीवन प्राधिकरणने संपूर्ण जलवाहिनी बदलून टाकावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.

फोटो : २४ जावेद खान

सदर बझार येथील जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, पाण्याचा अपव्यय सुरू आहे. (छाया : जावेद खान)