शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बालपण अडकतंय कायद्याच्या कचाट्यात!

By admin | Updated: September 18, 2014 23:26 IST

तीनशे बालके विधिसंघर्षग्रस्त : खून, दरोडा, मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग

संजय पाटील - कऱ्हाड -अठरा वर्षांपर्यंतच वय निरागस मानलं जातं. या काळात संबंधित मुलाकडून एखादी चूक झालीच, तर त्याला पालकांकडून तत्काळ माफही केलं जातं; पण एखाद्या बालकाची चूक कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा ठरते. संबंधित बालकाला कायद्याच्या भाषेत ‘विधिसंघर्षग्रस्त’ म्हणून ओळखलं जातं. कऱ्हाड शहर पोलिसांच्या दप्तरी २००६ पासून तीनशेहून अधिक बालके गुन्ह्यात अडकल्याची नोंद आहे. या नोंदीतून अल्पवयीन मुलांभोवती पडत असलेला गुन्हेगारीचा विळखा अधोरेखित होतोय. गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग सध्या चिंतेचा विषय बनलाय. अनेक मुले हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तर काहीजण फक्त मौजमजेसाठी गुन्हा करीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. कऱ्हाड शहरात गत काही वर्षांमध्ये घडलेल्या खून, मारामाऱ्या, खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी, मोनोग्राम चोरी, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अनेक अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या मुलांमध्ये गरीब, अनाथ मुले आहेतच; पण सुखवस्तू कुटुंबातीलही मुले पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतल्याची उदाहरणे आहेत. काही मुलांचा गुन्हेगारी मार्गावरील प्रवासही थक्क करणारा आहे. व्यावसायिक, नोकरदार, प्रतिष्ठित कुटुंबातील मुलेही चैनीखातर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहेत. काही मुले वाईट संगतीमुळे या मार्गाला लागल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच काही अट्टल गुन्हेगारांकडूनही गुन्हे करण्यासाठी बालकांचा वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अट्टल गुन्हेगारांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्यांच्याकडून गुन्हे करण्यासाठी जाणीवपूर्वक बालकांचा वापर करून घेतला जातो. त्यासाठी ते बालकांना कधी पैशाचे तर कधी पाठिंब्याचे आमिष दाखवतात.या प्रलोभनाला बळी पडलेली मुले गुन्हा करून कायद्याच्या कचाट्यात अडकतात; पण कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या अशा मुलांना कायद्यातील पळवाटा शोधून बाहेर काढणे सोपे असते, हे अट्टल गुन्हेगारांना माहीत आहे. त्यामुळे ते सर्रास अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये उपयोग करून घेतात. अशातूनच संबंधित अल्पवयीन मुले निर्ढावतात आणि पुढे गुन्हेगारी क्षेत्राशी जोडली जाऊन आयुष्यातून उठतात, असे समोर आले आहे.आमिष, स्पर्धात्मक वातावरण आणि समाजातील भूलभुलैय्या बालगुन्हेगारीला कारणीभूत ठरतोय. तसेच आपल्या अज्ञानाला बालके स्वत:च बळी पडत आहेत. विधिसंघर्षग्रस्त बालकांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बालकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक बालके कोणाच्या तरी दबावाला, आमिषाला बळी पडून गुन्ह्यात अडकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाळा, कॉलेज व नातेवाइकांनी बालकांकडे लक्ष द्यायला हवे. तसेच बालगुन्हेगारी रोखण्यात समाजाची भूमिकाही महत्त्वाची आहे. - बी. आर. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक२००६ नंतरच्या गुन्ह्यातील विधिसंघर्षग्रस्तखून ३, खुनाचा प्रयत्न ५, दरोडा ९, जबरी चोरी ३, दिवसा घरफोडी १८, रात्री घरफोडी १२, सर्व प्रकारच्या चोऱ्या १४५, गर्दी मारामारी ३१, दुखापत १३, शासकीय नोकर हल्ला ३, बलात्कार २, विनयभंग ३, शरीराविरूद्धचे गुन्हे ४०, मालमत्तेविरूद्धचे गुन्हे १५५.लहान वयात होणारे संस्कार मनावर खोलवर रूजतात. त्यामुळे बालवयातच चांगल्या प्रकारचे संस्कार घडविणे गरजेचे असते. शिक्षक विद्यार्थ्याला आदर्शवत बनविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, मूल कायम पालकांच्या सहवासात अधिक काळ असते. त्यामुळे त्यांनी जबाबदारी जाणून घ्यायला हवी. बालकात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला तर बालगुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. - नकुशी देवकर, शिक्षिकाकायदा काय सांगतो..?१ अठरा वर्षांखालील बालक एखाद्या गुन्ह्यात अडकल्यास त्याला ‘आरोपी’ संबोधण्यास कायद्याने मनाई आहे. संबंधित बालकाला ‘विधिसंघर्षग्रस्त’ अशी संज्ञा तयार करण्यात आली आहे. २ बालकांचा सहभाग असलेले खटले बाल न्यायालयात चालविले जातात. ३ विधिसंघर्षग्रस्त बालकास बेड्या घालण्यासही मनाई आहे. पोलिसांनी अशा बालकासमोर जाताना साध्या वेशात जावे, असाही नियम आहे. ४ विधिसंषर्घग्रस्त बालकावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याला तुरूंगात पाठविले जात नाही, तर पालकांच्या निगराणीखाली त्याला बालसुधारगृहात पाठविले जाते. ५ संबंधित बालकाला तत्काळ जामीन देण्याचा अधिकारही पोलिसांना आहे.