शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण अन् पवारांवर दिल्लीचा अन्याय!

By admin | Updated: November 25, 2015 23:49 IST

रामराजेंची खंत : यशवंतरावांनंतर शरदरावांचाही झाला नाही बहुमान; अमृतमहोत्सवी पुरस्कारांचे वितरण

सातारा : ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या इतकीच गुणवत्ता आणि संपूर्ण देशाच्या व्यवस्थेची जाण असणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधानपद मिळायला हवे होते; परंतु दिल्लीतल्या राजकीय खेळापायी अजून ते घडले नाही,’ अशी खंत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील कृषी, सहकार, महिला सबलीकरण, औद्योगिक, साहित्यिक व क्रीडा क्षेत्रांत उत्कृष्ठ कार्याबद्दल संस्था व व्यक्तींना ‘शरद अमृतवर्ष’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप धरू तसेच संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. बी. डी. पवार म्हणाले, ‘शरद पवार यांनी आपल्या अभ्यासपूर्ण नेतृत्वातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. आयात नाही तर निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख जगभर निर्माण करण्यात पवारांचा प्रमुख वाटा आहे. त्यांच्याच आयात-निर्यात धोरणामुळे आजच्या घडीला कृषी क्षेत्रातून तब्बल २३२ अब्ज रुपयांची निर्यात भारत करतो आहे. दलाली व्यवस्थेला फाटा देऊन शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळण्यासाठी व्यावसायिक धोरण राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यावसायिक प्रगती करता आली आहे. १९८९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीमालाच्या निर्यातीचा पाया घातला. आंबा, द्राक्षे ही फळपिके त्यांनी निर्यात केली. सामुदायिक मार्केटिंग व्यवस्था, बचतगटांना प्राधान्य, हॉर्टीकल्चर मिशन, शेतीत तंत्रज्ञानाचा वापर अशी धोरण त्यांनी राबविली. देशाच्या शेती व्यवसायाला पवारांनीच ऐतिहासिक दिशा दिली आहे.’अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतरावांनंतर महाराष्ट्र ज्याला समजला तो शरद पवार यांनाच. दुर्दैवाने या दोघांइतकी जाण असलेला नेता महाराष्ट्रात नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजवून महाराष्ट्राचं पाऊल पुढे नेण्यात यशवंतरावांइतकंच शरदरावांनाही यश आलेय. कितीही पुढे गेलं तरी गावाची वेस विसरायची नाही, हे दोघांनीही जाणलं होतं. कर्नल संतोष घोरपडे यांच्या बलिदानानंतर पोगरवाडीत त्यांच्या कुटुंबीयांना भेटून व त्यांचे सांत्वन करून पवारांनी ते दाखवून दिले आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यातलं सगळ्यात मोठं साम्य म्हणजे समकालीन राहणं, हे होय. शिक्षण शक्तीचं सामर्थ्य दोघांच्याही कुटुंबीयांनी जाणले होते. त्यामुळे दोघेही अखिल भारतीय पातळीवर पोहोचू शकले आहेत. ’ (प्रतिनिधी)शरदरावांना चंद्र, सूर्याची उपमा‘जिथे समर्पण वृत्ती असते, तिथे जीर्णता कधीच दिसून येत नाही. चंद्र कधीही जुना होत नाही, सूर्य कधीही म्हातारा होत नाही, समुद्र कधीही आकसत नाही,’ अशा भाषेत दीक्षित यांनी शरद पवारांच्या कर्तबगारीला उपमा दिली. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.’