शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराई हुकल्याने बांगडी व्यावसायिक आर्थिक अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:37 IST

म्हसवड : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बाराबलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योग- धंदे बंद असल्याने उपासमार सुरू आहे. ...

म्हसवड : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बाराबलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योग- धंदे बंद असल्याने उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी एक बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावरचे पोट असणारा बांगडी भरणारा कासार सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. एकीकडे पोट भरायची चिंता तर दुसरीकडे कोरोनाची भीती या दुहेरी संकटात हे सापडले आहेत.

कोरोना संसर्गामुळे जगावर संकट कोसळले असून गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली जनता भरडली जात आहे. सर्व सण उत्सव सार्वजनिक कार्यक्रम यासह लग्नसमारंभ यावर शासनाने बंदी घातल्याने अनेक बाराबलुतेदारांचे उद्योग धंदे बंद आहेत. एप्रिल, मे या दोन महिन्यांत लग्नसराई मोठ्या प्रमाणात असते; पण सलग दुसऱ्या वर्षीही या दोन महिन्यांतच कोरोनामुळे हा हंगाम झालेला नाही. लग्नसराईत दोन तीन महिने व्यापार करून बाकीच्या काळात बऱ्यापैकी व्यवसाय नाही झाला तरी आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह वर्षभर उत्तम प्रकारे होत होता.

लग्नकार्यात बांगडी भरूनच लग्न कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यावरच खऱ्या अर्थाने लग्नसोहळ्याची सुरुवात होते; पण दोन वर्पांसून हे सोहळेही सोशल डिस्टन्सिंगमुळे कमी गर्दीत करून मोजक्या नातेवाइकात पार पाडण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे लग्न समारंभ होत आहेत; पण बाकी रीतीरिवाजाला डामडौलाला फाटा देऊन त्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या पोटावर पाय आला आहे. यामध्ये बांगडी, बँडवाले, घोडे, मंडपवाले, सजावट करणारे, फोटोग्राफर, भांडी फर्निचर, पार्लरवाले, चप्पल व्यसायिक, सौंदर्य प्रसाधने लेडीज शाॅपी व इतर व्यावसायिक व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

चौकट

कसे राखणार अंतर

सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक व्यवसाय सुरू असून ते करता येण्यासारखे आहेत; पण बांगडी हा व्यवसाय असा आहे की तो सोशल डिस्टन्सिंग पाळून करता येणे शक्य नाही. ग्राहकाला बांगड्या भरायच्या म्हटलं तर जवळून संपर्क येतोच. त्यामुळे सोशल डिस्टन्सपाळता येत नाही. कोरोनापासून संरक्षण करून हा व्यवसाय करणे म्हणजे या व्यावसायिकांना एक दिव्यच आहे.

कोट

बांगडी व्यवसाय हा कोरोनापासून संरक्षण पाळण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाळून जसे सामाजिक अंतर पाळून, हँडग्लोज वापरून बांगडी व्यवसाय करता येणे शक्य नाही. यामुळे एक तरी कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी व्यवसाय बंद ठेवणे हाच एकमेव पर्याय आहे. तरी शासनाने बांगडी व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी, तरच हा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना मदत होईल व जगू शकतील.

सुनीता कासार,

म्हसवड