शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी, जाणून घ्या प्रमुख धरणातील पाणीसाठा

By नितीन काळेल | Published: August 31, 2023 1:24 PM

धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज

सातारा : जिल्ह्यात दुष्काळ छाया गडद असून यावर्षी सप्टेंबर उजाडला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होईना असे स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात टंचाईचे तसेच शेती पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्यस्थितीत पश्चिमेकडील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडीसह मोठे सहा प्रकल्प भरण्यासाठी २८ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर या प्रमुख धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा तब्बल १४१८ मिलीमीटर पाऊस कमी आहे.जिल्ह्यात चार-पाच वर्षांतून दुष्काळाची स्थिती निर्माण होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये दुष्काळाने लोकांना हैराण करुन सोडले होते. चार लाखांवर लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला. तसेच माण, खटाव तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या होत्या. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, सप्टेंबर महिना उजाडला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्व भागातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे.तर दुसरीकडे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी धरणे अजून भरलेली नाहीत. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबरमध्येही पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणे भरणार का याविषयी साशंकता आहे. कारण, बलकवडीसारखे धरण काठावर असलेतरी इतर धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, उरमोडी आणि तारळी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. या धरणात सध्या १२१.६७ टीएमसीच पाणीसाठा आहे. तर गतवर्षी या धरणात १४१.१९ टीएमसी पाणीसाठा झालेला. त्यावेळी पाऊस सुरुच असल्याने धरणांतून विसर्ग सुरू होता. तसेच ही धरणे ९५ टक्क्यांपर्यंत भरलेली.मात्र, यावर्षी उलट स्थिती झालेली आहे. त्यातच या धरणक्षेत्रात पावसाची तूट मोठी आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा १४१८ मिलीमीटर पाऊस कमी झालेला आहे. मागीलवर्षी ३० आॅगस्टपर्यंत या प्रमुख सहा धरणक्षेत्रात तब्बल ९ हजार ४९६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा ८ हजार ७८ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. यामुळे सप्टेंबर महिना उजाडला तरी धरणे भरलेली नाहीत. त्यातल्या त्यात तारळी, बलकवडी धरणाची स्थिती चांगली आहे. पण, कोयना आणि उरमोडी भरण्यासाठी सतत आणि मोठ्या पावसाची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ