शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता सर्व दुकाने सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...

सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी काढले. हे आदेश २६ जुलैपासून ते पुढील आदेश होईपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.

सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार, सातारा जिल्ह्यामध्ये आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पिटलमधील औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकान, आस्थापना या सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट यांना आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत घरपोच पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग सुरु ठेवण्यास परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी असेल. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे यासाठी आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ यावेळेत परवानगी असेल. खुल्या जागेतील क्रीडाविषयक बाबी या आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, कोणत्याही क्रीडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल.

चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी ५ नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. लग्न समारंभ दोन तासांपेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत २५ लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ.सह) मर्यादेत लग्न आयोजन करण्याकामी संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल, त्यांनी बांधकाम करण्यास हरकत नाही. तथापि, ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल, अशा मजुरांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत बांधकामाचे ठिकाण सोडावे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारे बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

हे पूर्णत: बंदच राहणार...

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थनास्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे, व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर, मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे आदी पूर्णपणे बंद राहतील.

बाजार समित्यांमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यवहार

सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जाऊन माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीला बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल, या शर्तीसह समित्या सुरु राहतील.