शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळात जिल्ह्यात ५१ मुली सैराट; २८ घरी परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, वर्षभरात जिल्ह्यात ५१ मुली व मुले घरातून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सातारा : प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, वर्षभरात जिल्ह्यात ५१ मुली व मुले घरातून पळून गेली असल्याचे समोर आले आहे; तर यातील केवळ २८ मुली घरी परतल्या आहेत. काही मुलींना पोलिसांना शोधावे लागले.

पूर्वीची ॲरेंज मॅरेजची पद्धत सध्याच्या काळात हळूहळू लुप्त होतेय की काय, अशी भीती समाजमनातून व्यक्त होत आहे. हल्लीची तरुणाई स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी ही पिढी असल्यामुळे आपल्या भावी आयुष्याचा कोण जोडीदार असेल, याचा निर्णयही हीच पिढी घेत आहे. वर्षभरापूर्वी कोराेनाने जिल्ह्यात प्रचंड कहर माजविला होता. असे असतानाही जिल्ह्यातून २८ मुली घरातून गायब झाल्या होत्या. काही पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली; तर काही पालकांनी मुलीचा शोध न घेणेच पसंत केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मात्र, पोलिसांच्या मागे चांगलचा ससेमिरा लावला.

१५ मुलींचा शोध लागेना

घरातून निघून गेलेल्यांपैकी काही मुली सज्ञान आहेत. या मुलींनी ‘मी माझ्या मर्जीनुसार लग्न केले आहे,’ असे सांगितले आहे. त्यामुळे अशा मुलींचा शोध पोलिसांनी थांबविल्यात जमा आहे.

पोलिसांचाही नाइलाज

अनेकदा मुले-मुली घरातून पळून गेल्यानंतर पालक अस्वस्थ होतात. दोघे सहमतीने पळून गेले असले तरी त्यांना शोधण्याचा आग्रह घरातील लोक धरत असतात. त्यामुळे पोलिसांना अशा पळून गेलेल्या मुलांना शोधावेच लागते. इतर गुन्ह्यांचा तपास करीत पोलिसांना सैराट मुला-मुलींचा शोध घ्यावा लागतो.

२३ मुलेही बेपत्ता

काही मुले प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेली आहेत; तर काही मुलांनी काैटुंबिक कलहातून घर सोडले आहे. ‘मिसिंग’ची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस युवकांचा बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुले सापडत नाहीत.