शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४१० गावे पुन्हा प्रकाशली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून ...

सातारा : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब गाडले गेले तर कुठे महापुराने वाहून नेले. परिणामी ४२६ गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे ४१० गावे पुन्हा प्रकाशमान करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यात दि. २२ व २३ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले. तब्बल ४२६ गावे व तेथील २ हजार ५० रोहित्रांना याचा फटका बसला. दीड हजारांहून अधिक खांब जमीनदोस्त झाले. घरगुती व व्यापारी वर्गवारीतील ६६ हजार ६५६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले. हे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करणे गरजेचे होते. महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करुन हे आव्हानात्मक काम कमी कालावधीत पूर्ण करत आणले आहे.

बुधवार, दि. २८ पर्यंत ४२६ पैकी ४१० गावे पुन्हा प्रकाशमान झाली आहेत. १८१ पोल उभे करून बंद पडलेली १ हजार ५६४ रोहित्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे घरगुती, व्यापारी मिळून ६४ हजार ४२४ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला तर शेतीच्या १७ हजार २४४ पैकी ८ हजार ४२२ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. सर्व मिळून ७३ हजार ८९ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात वीज कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १६ गावांचा वीजपुरवठा बंद असून, तो सुरू करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

(चौकट)

या गावांची वीज खंडित

महाबळेश्वर : धारे, बिरवडी, जावली, छतीरबेट, घोणसपूर व घरोशी

जावली : वहिटे, बाहुले, भूतेघर व बोंडरवाडी

पाटण : निगडे, कठनी, घोटील, जिंती व उमरकांचन

कऱ्हाड : जुझारवाडी

(चौकट)

१२ खांब उभे करून केळघर वाहिनी सुरू

अतिवृष्टीमुळे मेढा उपविभागातील केळघर उच्चदाब वाहिनीचे १२ खांब पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने १२ गावांचा वीजपुरवठा ठप्प झालेला. मंगळवारी वीज कर्मचारी व व स्थानिक ठेकेदारांच्या कामगारांनी खांद्यावर कावड करून खांब वाहून नेले. सर्व अडचणींवर मात करून कामगारांनी १२ खांब उभे केले. यानंतर केळघर, केडंबे, नांदघणे, वरोशी, पुनवडी, डांगरेघर, कुरुळोशी, धावली, तळोशी, वाळंजवाडी, वाटंबे, मुकवली, या गावांतील एकूण ७२८ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला.

फोटो : २८ एमएसईबी फोटो

वीज कर्मचाऱ्यांनी केळघर वाहिनीचे खांब खांद्यावर वाहून नेऊन केळघर विभागातील बारा गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला.