शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या जमिनीची भरपाई कधी?

By admin | Updated: February 2, 2015 00:03 IST

तिकोंडीतील शेतकऱ्यांचा सवाल : नुकसान, पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दरीबडची : तिकोंडी (ता. जत) येथील तलावासाठी संपादन केलेल्या जमिनीची नुकसानभरपाई, पुनर्वसन व पुनर्वसाहत करुन मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रशेखर रेबगोंड, राजू पुजारी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे केली आहे.बागायत आणि जिरायत क्षेत्र याप्रमाणे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता दाखविण्याचा हक्क अधिनियम २०१३ च्या ३० अन्वये व प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९९९ व २००१ या महाराष्ट्र अधिनियम क्र. ११ अन्वये जिल्हाधिकारी यांनी १८९९ चारमध्ये नमूद केलेले कोणतेही असल्यास बाजारमूल्य या कलमामध्ये जमिनीचे बाजारमूल्य निर्धारित करताना विचार करावयाचे निकष व घटक यासंबंधात तरतूद आहे. नुकसानभरपाईची रक्कम निर्धारित करण्याबाबत कलम २८ अन्वये तरतूद आहे. या कलमामध्ये सोलॅटियमच्या निवडीबाबत तरतूद आहे. सोलॅटियमची रक्कम ही नुकसान भरपाईच्या रकमेच्या १०० टक्के इतकी असेल, तसेच निवडीची किंवा ताबा घेण्याची तारीख यापैकी जी अधिक असेल, त्या तारखेपर्यंत जिल्हाधिकारी बाजार मूल्यांवर वार्षिक १२ टक्के दराने गणना केलेल्या रकमेच्या निवडी देईल, अशीदेखील तरतूद या कलमामध्ये आहे. परंतु भू-संपादन करताना बाजारमूल्य निर्धारित केलेले नाही. कमी मूल्य धरण्यात आले आहे. बाग, घर, विहीर, जमीन, कूपनलिकाचे मूल्यांकन कमी दराने केले आहे. केंद्राच्या भू-संपादन कराराप्रमाणे मिळावे. जमिनीची मोबदल रक्कम व ज्यांची घरे गेली आहेत, त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत विशेष भूमिसंपादन अधिकारी नं. १ मिरज यांना दिली आहे. निवेदनावर मल्लाप्पा बळूर, विठ्ठल महाजन, यांच्यासह ९३ ग्रामस्थांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)एकरी केवळ साठ हजारांची भरपाईतिकोंडी येथील नवीन साठवण तलावासाठी पाच वर्षांपूर्वी जमीन संपादन करण्यात आली आहे. तलावात गेलेली जमीन, घरे, विहिरी, कूपनलिका, फळबागांचे सर्वेक्षण होऊनसुध्दा नुकसानभरपाई मिळालेली नाही. तलावासाठी ९३ शेतकऱ्यांची ७५ एकर जमीन पाच वर्षापूर्वी भूसंपादन करण्यात आली आहे. शासकीय दरानुसार संपादन केलेल्या जमिनीचा दर ठरविण्यात आला असून, एकरी ६० हजार इतकीच भरपाई मंजूर झाली आहे. जमिनीची भरपाई कमी असल्याने शेतकऱ्यांनी रक्कम स्वीकारली नाही.