शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागात ‘खळळ्-खट्याक’

By admin | Updated: February 23, 2015 23:56 IST

दूषित पाणीपुरवठ्याबाबत संताप : कार्यालयाच्या काचा फोडून मोडतोड

सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड केली. त्यांच्या ‘खळ्ळ्-खट्याक’ आंदोलनामुळे पाणीपुरवठा विभागात पळापळ सुरू झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्याने आंदोलनकर्ते निवेदन देऊन परतले. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा वाजता पंचवीस कार्यकर्त्यांसह ते हिराबाग येथील पाणीपुरवठा कार्यालयात दाखल झाले. दूषित पाणीपुरवठ्याबद्दल महापालिकेचा निषेध करीत त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यानंतर कार्यालयात गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी लाथा घालून काचा फोडल्या. फर्निचरचीही मोडतोड केली. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याठिकाणी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना अडविले. निवेदन देऊन शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्यामुळे याठिकाणच्या अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील साडेपाच लाख लोकांना महापालिका पाणीपुरवठा करते. ६५ हजार ग्राहकांकडून दरवर्षी वीस ते बावीस कोटी रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही माळबंगला व हिराबाग येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये सध्या ढिसाळ कारभार सुरू आहे. त्यामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नाही. महापालिका क्षेत्रात गॅस्ट्रोने १३ जणांचा बळी गेल्यानंतरही नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा प्रकार सुरूच आहे. जलशुद्धीकरण केंद्रातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात स्वाती शिंदे, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, निखिल जगताप, प्रियानंद कांबळे, रामभाऊ सूर्यवंशी, बाजीराव गस्ते, गजानन कांबळे, रोहित घुबडे-पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


विश्रामबागमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा
विश्रामबाग येथील दत्तनगर, महालक्ष्मी चौक, सावरकर कॉलनी, नागराज कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील नागरिकांनी आज, सोमवारी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दूषित पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. पाण्याला दुर्गंधीही येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केल्यानंतर व्यवस्थित उत्तर दिले जात नाही. नागरिकांच्यादृष्टीने हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांनी गढूळ पाण्याच्या बाटल्याही आयुक्तांना दाखविल्या. आयुक्तांनी याबाबत तपासणीचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. निवेदन देतेवेळी सुनील पट्टणशेट्टी, कौस्तुभ कुलकर्णी, अनिकेत मिक्कल, सतीश जगदाळे, सूरज शरणाथे, राजू बंडगर आदी उपस्थित होते.