शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विश्वेश्वरय्या : अभियंत्यांचे आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळतो तो ‘अभियंतादिनी’च. अभियंत्यांनी केलेल्या कामांची लोकांना ओळख व्हावी, अभियंत्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी ...

विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळतो तो ‘अभियंतादिनी’च. अभियंत्यांनी केलेल्या कामांची लोकांना ओळख व्हावी, अभियंत्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळावी, लोकांकडून त्यांना त्यांच्या कामाची शाबासकी मिळावी, या हेतूने ‘अभियंता दिन’ साजरा करून अभियंत्यांचा गौरवही केला जातो. विश्वेश्वरय्या यांनी दिलेल्या कानमंत्रानुसारच आजही अभियंत्यांचे कार्य चालू आहे. शेतीव्यावसायिक पद्धतीने केल्याने अधिक उत्पादन मिळू शकते, देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये विश्वेश्वरय्या यांनीच जागविला. जेव्हा मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना असे, त्यावेळी सर विश्वेश्वरय्या हे अभियांत्रिकीच्या पलीकडे जाऊन विचार करीत असत. प्रस्तावित प्रकल्प हा कसा जास्तीत-जास्त समाजोपयोगी ठरेल व आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, याचा ते बारकाईने अभ्यास करीत असत. त्यांची धोरणे आणि त्यांनी उभारलेली धरणे, इमारती, पूल आजही आमच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे.

भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतीचा विकास झाल्याशिवाय सर्वांगीण विकास होणार नाही, यावर त्यांचा विश्वास होता. याचमुळे त्यांनी अनेक कृषी विद्यालये सुरू केली. शेती ही केवळ पाऊस व नशिबावर अवलंबून ठेवणे योग्य नाही; तर ती शास्त्रीय आणि व्यावसायिक पद्धतीने करता येऊ शकते, त्यामुळे अधिक उत्पादन मिळू शकते, परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा आत्मविश्वास त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागविला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये स्थापन केली, शिवाय म्हैसूर विद्यापीठाचीही मुहूर्तमेढ रोवली.

सर विश्वेश्वरय्या यांनी महात्मा गांधीजींच्या बरोबरीनेही हिरीरिने काम केले. काहीबाबतीत त्यांचे मत-मतांतरे असली तरी, ध्येय एकच होते, ते म्हणजे ‘राष्ट्रउभारणी.’ भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांचा पाया घालण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.