शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफी घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST

इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने ...

इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. २०१५चा शासन निर्णय रद्द करून २०१९च्या धर्तीवर विनाअट संपूर्ण कर्जमाफी घेण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, पूरस्थितीची पाहणी करताना, उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज देणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे म्हटल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय शासन निर्णयात नाही. पूर ओसरून महिना झाला, तरी सरकार काय करत आहे, हे कळत नाही.

ते म्हणाले, मागील सरकारला शेतीमधील काही कळत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, त्यांनी हेक्टरी ३८ हजार रुपयांची मदत दिली होती. या सरकारने सोयाबीनला गुंठ्याला ६८ आणि उसाला १३५ रुपये देऊन शेतकऱ्यांची घोर थट्टा केली आहे.

शिवाजीराव नाईक म्हणाले, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या मदतीतून वैरणीचा खर्चही निघणार नाही. निशिकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मंगळवारच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत.

यावेळी महेश खराडे, ॲड.एस.यू. संदे, विजय पवार, संदीप राजोबा, शाकीर तांबोळी, सनी खराडे, पोपटराव मोरे, धनाजी गावडे, अप्पासाहेब कांबळे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

चौकट

मंगळवारी मोर्चा..

शेट्टी म्हणाले, मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसील कचेरीजवळून या आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात वाळवा-शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तेथे जाहीर सभा होईल.