शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गटांच्या सामर्थ्याची तिरंगी लढत

By admin | Updated: October 1, 2014 23:59 IST

चौघे अपक्ष रिंगणात : महाडिक, जयंत पाटील गटांची भूमिका निर्णायक

विकास शहा - शिराळा-विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख या तीन पारंपरिक गटांबरोबर निवडणूक रिंगणात नंदकिशोर नीलकंठ (शिवसेना), वैभव वाघमारे (बसपा) या पक्षीय उमेदवारांसह चार अपक्ष उमेदवारही आहेत. अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेऊन शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याच्या पवित्रा घेतल्याने रंगत आली आहे.या मतदारसंघातील राजकारण १९९५ पासून सतत बदलत आहे. दोन नाईक-देशमुख हे तीन प्रमुख गट प्रत्येकी वेगवेगळ्या भूमिकेतून पाठिंबा व्यक्त करीत होते. २००४ मध्ये तिन्ही गटांचे उमेदवार रिंगणात होते. यावेळीही हे तिन्ही गट एकमेकांसमोर आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, नानासाहेब महाडिक या गटांच्या भूमिका निर्णायक ठरल्या आहेत. त्यावेळी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांनी शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतला आहे. तिन्ही गटांचे नेते महाडिक गटाच्या संपर्कात होते. याबाबत महाडिक गट उद्या, दि. २ आॅक्टोबर रोजी अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहे. जयंत पाटील हे मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर असल्याने वाळवा तालुक्यातील मतदान त्यांना मिळेल, असा दावा त्यांच्या गटाकडून केला जात आहे.आमदार नाईक गेल्या पाच वर्षात ५१७ कोटींची विकासकामे, वाकुर्डे योजना कार्यान्वित, गिरजवडे प्रकल्प कामास सुरुवात, विविध प्रकल्पांची उभारणी या मुद्यांवर निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक वाकुर्डे योजना, विविध प्रकल्पांची उभारणी, पाच वर्षातील खुंटलेला विकास हे विषय घेऊन रिंगणात उतरले आहेत. तसेच सत्यजित देशमुख यांनी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केलेली विकासकामे, पक्षीय कामे, गेल्या पाच वर्षात आणलेला विकास निधी यावर भर दिला आहे.२००४ मध्ये दोन नाईक गटात फूट पडली, त्यामुळे मानसिंगराव नाईक पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख बंडखोरी करून रिंगणात होते. त्यामध्ये शिवाजीराव नाईक विजयी झाले होते. या निवडणुकीत तिन्ही गट एकमेकांविरुध्द लढले होते. २००९ मध्ये सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यामध्ये शिवाजीराव नाईक पराभूत झाले होते. आता यावेळी पुन्हा तीन गट एकमेकांसमोर आहेत. तसेच तिन्हीही उमेदवार यावेळी पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत. आमदार नाईक, माजी आमदार नाईक यांनी सहा महिन्यांपासूनच प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर सत्यजित यांनी आघाडी झाली नाही तर आपल्याला उमेदवारी मिळेल या विचारात प्रचार धिम्या गतीने चालू ठेवला होता. आता त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे. भाजप-शिवसेना वेगळी झाल्याने याचा फटका या युतीच्या उमेदवारांना बसणार आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या उमेदवारांनाही मतविभागणीचा फटका बसेल. तिन्ही उमेदवार गावेच्या गावे, वस्त्या न वस्त्या, वाड्या न वाड्या पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांची पळवापळव, गेलेले कार्यकर्ते परत आणणे यासाठी प्रमुख नेत्यांची दमछाक होत आहे.शिवसेनेने नंदकिशोर नीलकंठ, बसपने वैभव वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मिळणारी मते निर्णायक ठरतील. निवडणुकीत या मतदारसंघातील दोन नाईक-देशमुख या तीन गटांची ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘आर या पार’ याप्रमाणे तिन्ही नेते मैदानात आहेत.शिराळाएकूण मतदार २,७४,४२७ नावपक्षमानसिंगराव नाईक राष्ट्रवादीशिवाजीराव नाईकभाजपसत्यजित देशमुखकाँग्रेसनंदकिशोर नीलकंठ शिवसेनावैभव वाघमारेबसपाविश्वजित पवारअपक्षबबनराव परीटअपक्षमोहन ऐतवडेकरअपक्षसंजय जाधवअपक्ष