शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूकदार सापडलेत रस्त्यांच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

दिघंची ते आटपाडीदरम्यान राज्यमार्गाचे काम सुरू आहे. कॉंक्रिटीकरणाचा रस्ता पूर्ण झाला नसल्याने वाहतूकदारांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. लोकमत ...

दिघंची ते आटपाडीदरम्यान राज्यमार्गाचे काम सुरू आहे. कॉंक्रिटीकरणाचा रस्ता पूर्ण झाला नसल्याने वाहतूकदारांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्याच्या विकासाची गाडी सुसाट धावणार आहे, पण सध्या तरी जिल्हा अर्धवट कामांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर राज्यमार्ग किंवा महामार्गाची कामे सुरू असल्याने वाहतूकदार हैराण झाले आहेत.

प्रत्येक तालुक्यात रस्त्यांची कामे अखंडपणे सुरू आहेत. मिरज-पंढरपूर, दिघंची- महूद, गुहागर-विजापूरपैकी कडेगाव-जत, पलूस-कडेगाव या प्रमुख रस्त्यांचा वनवास संपण्याची चिन्हे सध्यातरी नाहीत. या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांची कामे गतीने करण्याचे गांभीर्य प्राधिकरणाकडे नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ चे काम मिरज-पंढरपूर रस्त्यावर अनेक वर्षांपासून सुरू आहे. ठिकठिकाणी अनेक डायव्हर्शन्स, पुलांसाठी केलेली खोदकामे, अर्धवट झालेले कॉंक्रिटीकरण, अर्धवट पुलांचे सांगाडे अशी अडथळ्यांची शर्यत आहे. मिरज-पंढरपूर हा १२७ किलोमीटरच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासासाठी आता चार तास लागताहेत.

महूद-दिघंची-आटपाडी-भिवघाट या रस्त्याची अवस्थाही अशीच आहे. अर्धवट झालेली कामे अपघातांना आमंत्रण देताहेत. रात्रीचा प्रवास म्हणजे चक्रव्यूहातून सुटका करुन घेण्यासारखी स्थिती आहे. गुहागर-विजापूर महामार्गाचे काम वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरले आहे. पावसाळ्यात कडेगाव भागात अपघातांची मालिका सुरू होते. विटा ते दहीवडी रस्त्याची अवस्थाही शोचनीय आहे. ठिकठिकाणी अखंड दुरुस्त्या सुरू आहेत. हेरवाड-दिघंची राज्यमार्गापैकी मिरज-सलगरे रस्त्याचे कामही अजून संपलेले नाही. मिरज ते अंकली रस्त्यावर रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरू असून, अनेक वळणे व अर्धवट कॉंक्रिटीकरणातून वाट शोधावी लागते.

चाैकट

येथे आहे रस्त्यांचा चक्रव्यूह

मिरज - अंकली, दिघंची - आटपाडी, मिरज -पंढरपूर रस्ता, मिरज- सलगरे, कराड- पलूस, पलूस - कडेगाव, कडेगाव - जत, विटा - दहीवडी, दिघंची - भिवघाट

कोट

रस्त्यांच्या चक्रव्यूहामुळे प्रचंड त्रास होत आहे. इंधनाचा खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम भाडेवाढीमध्ये झाला आहे. महामार्ग भविष्यात सुखकारक ठरणार असला तरी सध्या मात्र प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.

बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

--------------