शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

खुजगावात हजारो एकर शेती क्षारपड

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

पिकांचेही मोठे नुकसान : वारणा डाव्या कालव्याच्या गळतीचा परिणाम

येळापूर : खुजगाव (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्यानजीक वारंवार होणारी गळती व त्यातून वाया जाणारे पाणी यामुळे भागातील पिकांच्या नुकसानीबरोबरच जमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
चांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यातून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला धरून वारंवार पाणी सोडले जाते. मात्र या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यातच अंतर्गत करण्यात आलेले अस्तरीकरण, काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे बनले आहे.
जागोजागी बसविण्यात आलेले रबर खराब झाल्याने यातूनही पाण्याची गळती होत आहे. या सततच्या गळतीमुळे शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत. जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने त्याचाही उपयोग होत नाही. जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. दुसरीकडे अति पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले की, डाव्या कालव्याची गळती काढावी, नव्याने सर्वेक्षण करावे, याबाबत सदाभाऊ खोत यांनी बैठकही घेतली होती. मात्र तत्कालीन सरकारने याची दखल घेतली नाही. नव्या सरकारने तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. (वार्ताहर)

लाखो लिटर पाणी वाया
चांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते.