शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

देशात अनिवासी पंतप्रधानांची मोठी समस्या

By admin | Updated: November 22, 2015 00:04 IST

जयंत पाटील : सिंगापूर, मलेशियाला जाऊन प्रश्न सुटणार नाही; कुपवाडमध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ

कुपवाड : भारत देशाला सध्या अनिवासी पंतप्रधान सापडले आहेत. ते देशात नसतातच, ही देशवासीयांसमोरील मोठी समस्या बनली आहे. काल-परवा इंग्लंडला गेले होते. त्यानंतर लगेच सिंगापूर, मलेशियाला गेले. त्यांच्या विदेश दौऱ्याबाबत सध्या सोशल मीडियावरून खरमरीत टीका होऊ लागली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केले. कुपवाडमधील विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी मल्हारराव होळकर चौकामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, स्रेहा औंधकर, शेडजी मोहिते, माजी महापौर मैनुद्दीन बागवान प्रमुख उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले की, सध्या महागाईने जनता त्रस्त बनली आहे. तूरडाळीची किंमत दोनशेच्या घरात पोहोचली आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला तोशीष बसू लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शासनाच्या कालावधित डाळीचे दर नियंत्रणात होते. स्वस्त धान्य दुकानातूनही आम्ही धान्य देत होतो. सध्या मात्र देशात नियोजनाचा अभाव आहे. कांदा आणि डाळीबाबत झाले ते पुढे साखरेबाबतही होणार आहे. जगात महागाईचा निर्देशांक कमी असताना देशातील महागाईचाही निर्देशांक कमी होणे गरजेचे आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्यानंतर भारतात मात्र त्यावर कर बसवून हजारो कोटी कमवून तिजोरी भरली. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर असताना भारतीय समुदायासमोर देशाचे गुणगाण गाण्याऐवजी देशातील कमजोरी दाखवू लागले आहेत. आपल्या देशातील कमजोरी बाहेरील देशात जाऊन सांगणे त्यांच्याकडून अभिप्रेत नाही, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक विष्णू माने, हरिदास पाटील, संजय औंधकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांची भाषणे झाली. यावेळी नगरसेविका आशा शिंदे, विलास सर्जे, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब लवटे, किरण सूर्यवंशी, प्रकाश व्हनकडे, ताजुद्दीन तांबोळी, मनगू सरगर, मारुती पाटील, बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)