शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजू शेट्टींनी सरकारमधून बाहेर पडावे

By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST

जयंत पाटील : समडोळी, मौजे डिग्रजला आभार दौरा; कार्यकर्त्यांशी संवादे

कसबे डिग्रज : शेतकरी आणि संपूर्र्ण ग्रामीण भागाची गळचेपी करणारा भूमी अधिग्रहण कायदा आणि कच्ची साखर निर्यात धोरण तसेच सहकारी संस्थांबाबतचे धोरण याबाबत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. पण शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे खा. राजू शेट्टी सत्तेला चिकटून आहेत. त्यांना खरोखरच स्वाभिमान असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान जयंत पाटील यांनी शेट्टी यांना दिले. समडोळी, मौजे डिग्रज येथील आभार दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपदाची आशा यामुळे राजू शेट्टींची अवस्था दयनीय आहे. शेट्टींनी स्वाभिमान गहाण टाकला आहे. शेतकऱ्यांना भांडवलधार्जिण्या सरकारच्या दावणीला बांधले आहे. हिम्मत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कधीही कमी पडणार नाही. मी कधीही ग्रामपंचायत, सोसायटीच्या स्थानिक निवडणुकांत लक्ष घालत नाही. त्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या निकालामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले. मौजे डिग्रज आणि समडोळी येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कसबे डिग्रज, मौजे डिग्रज या नवीन काम सुरू झालेल्या पुलाची पाहणीही करण्यात आली.
यावेळी उद्योजक भालचंद्र पाटील, भाऊसाहेब मगदूम, अजयसिंह चव्हाण, हरिदास पाटील, वैभव पाटील, प्रमोद आवटी, सुरगौंडा पाटील, भास्कर पाटील, रवी माणगावे, संजय हजारे उपस्थित होते. (वार्ताहर)

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखाने अडचणीत..
गतवेळेच्या शासनाने आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कच्ची साखर निर्यात लवकर सुुरू केली होती. त्यामुळे बाजारात साखरेचे भाव स्थिर होते; पण सध्या साखरेचे भाव २३०० पर्यंत खाली येत आहेत. त्यामुळे ऊसदर कोसळत आहे. २५०० दर देणारे कारखाने अडचणीत येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.