शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वर्गातील मुलांना शिकवायचे की आवरायचे? मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळताना शिक्षकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

पुरोहित कन्या प्रशालेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थिनींना मास्क सक्तीचा केला आहे. छाया : सुरेंद्र दुपटे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ...

पुरोहित कन्या प्रशालेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थिनींना मास्क सक्तीचा केला आहे.

छाया : सुरेंद्र दुपटे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : तब्बल दहा महिन्यांनी शाळा सुरु झाल्या. प्रदीर्घ सुट्टीनंतर सवंगडी एकत्र आले. अशावेळी त्यांच्या उत्साहाला आवर घालणार तरी कोण? पण ही मोठी जबाबदारी पार पाडण्याचे खूपच मोठे आव्हान शिक्षकांपुढे आहे.

शासनाने नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली खरी, पण सोबतच अटी आणि शर्तींची लांबलचक पत्रेही पाठवली. त्यांचे तंतोतंत पालन करेपर्यंत शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांची तारांबळ उडत आहे. अवखळ मुले सरांची पाठ फिरताच वर्गात धिंगाणा सुरु करतात. शासनाने मैदानावरील खेळांवर निर्बंध घातले आहेत, त्याची कसर मुले वर्गात भरून काढताना दिसत आहेत. शाळेच्या वेळेपूर्वीच येऊन वर्गात आणि मैदानावर मुलांचे खेळ रंगू लागले आहेत. त्यांना आवर घालण्यासाठी शिक्षकांना नाना क्लुप्त्या लढवाव्या लागत आहेत.

शाळेच्या मैदानावर मुले एकत्र येऊ नयेत, यासाठी काही शाळांनी प्रत्येक वर्ग सुटण्याच्या वेळेत काही अंतर ठेवले आहे. तास नसणारे शिक्षक मुलांवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. वर्ग सुरु होण्याअगोदरच मुले वर्गात येऊन खेळत बसू नयेत, याचीही खबरदारी घेतली जात आहे. हे सारे करताना शाळा व्यवस्थापन व शिक्षकांना चांगलीच सर्कस करावी लागत आहे.

पॉईंटर्स

पाचवी ते आठवी

- एकूण शाळा १,५८०

- विद्यार्थी उपस्थिती १,७५,४९९

- शिक्षक उपस्थिती ९,६००

कोट

वर्गात मास्कचा वापर सक्तीचा केला आहे. पन्नास टक्केच उपस्थिती असल्याने प्रत्येक बेंचवर एकाच विद्यार्थिनीला बसवतो. सोशल डिस्टन्सिंगची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

- रघुवीर रामदासी, शिक्षक

कोट

विद्यार्थ्यांचा परस्परांशी संपर्क येऊ नये, याची शंभर टक्के काळजी घेतो. मैदानावर रेंगाळणाऱ्या मुलांवर शिक्षक लक्ष ठेवतात. त्यासाठी तास नसणारे दोन शिक्षक जबाबदारी सांभाळतात. शाळेपर्यंत पालकच सोबत येत असल्यानेही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते.

- परेश पाटील, शिक्षक

कोट

विद्यार्थ्यांना आवरणे ही मोठी जबाबदारी असली तरी काळजी घ्यावीच लागते. संसर्गाच्यादृष्टीने लहान मुले संवेदनशील असल्याने अधिक काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या वस्तू घेण्यावरही निर्बंध आणले आहेत.

- शिवलिंग मगदूम, शिक्षक

------------