शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी, शेटफळे, नेलकरंजीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST

आटपाडी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियनांतर्गत घनकचरा ...

आटपाडी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजीचा समावेश करण्यात आला आहे. या अभियनांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प या गावांत राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे.

केंद्र सरकारने २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात गावे हगणदारीमुक्त केली. सध्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे. आटपाडी तालुक्यातील आटपाडी, शेटफळे आणि नेलकरंजी गावांचा समावेश झाला आहे. तिन्ही गावांतील सांडपाण्याचे एकत्रीकरण करण्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. ओला, सुका आणि इतर कचरा संकलित करून प्रक्रिया केली जाणार आहे. गावात नव्याने बंदिस्त गटर, चौकाचौकात कचराकुंडी, घंटागाडी आणि घनकचरा यंत्रणा उभी केली जाणार आहे. प्रकल्पाचे काम पाच वर्षे चालू राहणार आहे. त्याचा आराखडा बनवण्याचे काम दिल्लीतील संस्थेला दिले असून त्यांनी तिन्ही गावांना भेट देऊन गावची पाहणी करून कच्चा आराखडा तयार केला आहे. लवकरच अंतिम आराखडा तयार करून प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे.

यावेळी सरपंच सौ. वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच प्रा. अंकुश कोळकर, प्रकाश मरगळे, बाळासाहेब मेटकरी, विजय पाटील, नितीन सागर, राजेंद्र बालटे, सर्जेराव राक्षे, उमाकांत देशमुख, मधुकर माळी उपस्थित होते.