शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात संजयकाकांची ‘पायाभरणी’

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका : ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे ‘लक्ष्य’

दत्ता पाटील ल्ल तासगाव खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव तालुक्यात, वेगवेगळ्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा रणसंग्राम होणार आहे. या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजकारणाची भक्कम पायाभरणी करण्यासाठी तालुका पिंंजून काढण्यास सुरुवात केली आहे. संजयकाकांचा विकासकामांचा दौरा चर्चेचा ठरला असून, तालुक्यातील सत्तास्थाने काबीज करण्यासाठी स्थानिक संस्थांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. तासगाव तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले. तालुक्यातील आबा गट आणि काका गट या निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आले. मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत महत्वपुर्ण घटक असणाऱ्या तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांवर आबा गटाचे वर्चस्व असल्यामुळे बाजार समितीचा गड खासदार पाटील यांना काबीज करण्यात अपयश आले. सहकारी संस्थांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांत वर्चस्व मिळवायचे असेल तर राजकारणाचा पाया ठरणाऱ्या सोसायट्या आणि ग्रामपंचायतीवर वर्चस्व असणे महत्वपुर्ण आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा पाया भक्कम ठेवल्यामुळेच त्यांची राजकीय वाट सुकर झाली. त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीचा पाया डळमळीत करुन भाजप भक्कम करण्यासाठी खासदार पाटील यांनी रणनीती आखली आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु आहे. खासदार फंडासह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांत विकासकामे मंजूर केलेली आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी विकासकामांच्या बाबतीत खासदारांनी हात सैल सोडला आहे. त्यामुळे खासदार समर्थक कार्यर्त्यांतदेखील फील गुडचे वातावरण आहे. शुकवारी खासदार संजयकाकांनी मांजर्डे जिल्हा परिषद गटातील काही गावांत विविध विकास कामांचे उद्घाटन केले. आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत मांजर्डे जिल्हा परिषद गटातील वाड्यांसह बहुतांश गावांचा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाच पाठिंबा राहिला आहे. आबा-काका विरोधात झालेल्या प्रत्येक लढतीत आबांच्या पारड्यातच झुकते माप पडले होते. खासदार पाटील यांनी पहिल्याच टप्प्यात मांजर्डे गटावर लक्ष्य केंद्रीत करुन विकासकामांच्या निमित्ताने राजकारणाची भक्कम पायाभरणी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात ४५ गावांतील विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये निवडणुका होणार असलेल्या ३९ गावांचा समावेश आहे.