शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

बिहारी हात फुलवताहेत सांगलीची बागायत; डाळिंब, द्राक्षपट्ट्यात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या ...

सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या मजुरीच्या तुलनेत सध्या तीन-चार पटींनी मजुरी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वेगाने वळला आहे. त्याशिवाय परप्रांतीय मजुरांची गर्दीही जिल्ह्यात वाढली आहे.

पुरुष मजुराला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कामासाठी ४५० रुपये द्यावे लागत आहेत. याच कामासाठी महिला मजूर २५० रुपये घेत आहे. बडे शेतकरी जादा पैसे देऊन मजूर खेचत असल्यानेही मजुरीत वाढ होत गेली आहे.

याला पर्याय म्हणून यंत्रे येत असली तरी काही विशिष्ट कामांना मजुरांशिवाय गत्यंतर नाही. यावर उपाय शोधताना शेतकरी चक्क बिहार, उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. मिरज, तासगाव, खानापूर तालुक्यांचा द्राक्षपट्टा, तसेच जत, आटपाडीच्या डाळिंब पट्ट्यात हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर राबताना दिसत आहेत. घाऊक स्वरूपात कामे ठेक्याने घेऊन करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळाला आहे. ऊसतोडीलाही यंत्रांचा वापर सुरू आहे.

मजुरांच्या जागी ट्रॅक्टर आणि ड्रोनदेखील!

वाढलेली मजुरी, मजुरांची टंचाई यामुळे यांत्रिकीकरण झाले. उसाच्या भरणीपासून तोडीपर्यंत सर्व कामांसाठी यंत्रे वापरली जाताहेत. शाळू, सोयाबीन, मक्याची पेरणी, द्राक्षाची औषध फवारणी, हळदीची भरणी, पाचटाचे गठ्ठे बांधणे, सरी सोडणे, ठिबकसाठी औषध मिसळणे ही सारी कामे ट्रॅक्टर आणि ड्रोनद्वारे होताहेत.

फक्त भांगलणीला मजूर

भांगलणी वगळता अन्य बहुतांशी कामे यंत्राने सुरु झाली आहेत. मोठ्या पिकांत मात्र यंत्रे चालत नसल्याने मजुरांचा वापर करावा लागतो.

मोठ्या शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. द्राक्षबागेच्या कामासाठी कर्नाटकातून मजूर आणावे लागतात. जादा पगारासह त्यांच्या वाहतुकीचाही खर्च करावा लागतो. यांत्रिकीकरण झाले असले तरी काही ठराविक कामांसाठी मजुरांशिवाय पयार्य नाही.

- दिलीप बुरसे, बागायतदार, बेडग

द्राक्षबागेसाठी बिहारी मजूर उपलब्ध करावे लागले. स्थानिक मजुरांचे पगार परवडत नाहीत, शिवाय ते नियमितपणे कामही करत नाहीत. बिहारी कामगार अंगावर घेऊन वेळेत कामे पूर्ण करतात. त्यामुळे सोनी, भोसे भागात हजारोंच्या संख्येने उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर आम्ही आणलेत.

- सुरेश नरुटे, शेतकरी, सोनी

मोठ्या शेतकऱ्यांनी मजूर मिळविण्यासाठी पगार वाढवत नेले, त्याचा त्रास छोट्या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चार-पाचशे रुपये मजुरी देणे त्यांना परवडत नाही. शेतीची कामे घरातूनच करावी लागतात. तरुणवर्ग शेतमजुरीला येत नसल्यानेही मजूर मिळणे मुश्किल झाले आहे.

- विष्णू पाटील, शेतकरी, सांगलीवाडी