शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बिहारी हात फुलवताहेत सांगलीची बागायत; डाळिंब, द्राक्षपट्ट्यात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या ...

सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या मजुरीच्या तुलनेत सध्या तीन-चार पटींनी मजुरी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वेगाने वळला आहे. त्याशिवाय परप्रांतीय मजुरांची गर्दीही जिल्ह्यात वाढली आहे.

पुरुष मजुराला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कामासाठी ४५० रुपये द्यावे लागत आहेत. याच कामासाठी महिला मजूर २५० रुपये घेत आहे. बडे शेतकरी जादा पैसे देऊन मजूर खेचत असल्यानेही मजुरीत वाढ होत गेली आहे.

याला पर्याय म्हणून यंत्रे येत असली तरी काही विशिष्ट कामांना मजुरांशिवाय गत्यंतर नाही. यावर उपाय शोधताना शेतकरी चक्क बिहार, उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. मिरज, तासगाव, खानापूर तालुक्यांचा द्राक्षपट्टा, तसेच जत, आटपाडीच्या डाळिंब पट्ट्यात हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर राबताना दिसत आहेत. घाऊक स्वरूपात कामे ठेक्याने घेऊन करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळाला आहे. ऊसतोडीलाही यंत्रांचा वापर सुरू आहे.

मजुरांच्या जागी ट्रॅक्टर आणि ड्रोनदेखील!

वाढलेली मजुरी, मजुरांची टंचाई यामुळे यांत्रिकीकरण झाले. उसाच्या भरणीपासून तोडीपर्यंत सर्व कामांसाठी यंत्रे वापरली जाताहेत. शाळू, सोयाबीन, मक्याची पेरणी, द्राक्षाची औषध फवारणी, हळदीची भरणी, पाचटाचे गठ्ठे बांधणे, सरी सोडणे, ठिबकसाठी औषध मिसळणे ही सारी कामे ट्रॅक्टर आणि ड्रोनद्वारे होताहेत.

फक्त भांगलणीला मजूर

भांगलणी वगळता अन्य बहुतांशी कामे यंत्राने सुरु झाली आहेत. मोठ्या पिकांत मात्र यंत्रे चालत नसल्याने मजुरांचा वापर करावा लागतो.

मोठ्या शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. द्राक्षबागेच्या कामासाठी कर्नाटकातून मजूर आणावे लागतात. जादा पगारासह त्यांच्या वाहतुकीचाही खर्च करावा लागतो. यांत्रिकीकरण झाले असले तरी काही ठराविक कामांसाठी मजुरांशिवाय पयार्य नाही.

- दिलीप बुरसे, बागायतदार, बेडग

द्राक्षबागेसाठी बिहारी मजूर उपलब्ध करावे लागले. स्थानिक मजुरांचे पगार परवडत नाहीत, शिवाय ते नियमितपणे कामही करत नाहीत. बिहारी कामगार अंगावर घेऊन वेळेत कामे पूर्ण करतात. त्यामुळे सोनी, भोसे भागात हजारोंच्या संख्येने उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर आम्ही आणलेत.

- सुरेश नरुटे, शेतकरी, सोनी

मोठ्या शेतकऱ्यांनी मजूर मिळविण्यासाठी पगार वाढवत नेले, त्याचा त्रास छोट्या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चार-पाचशे रुपये मजुरी देणे त्यांना परवडत नाही. शेतीची कामे घरातूनच करावी लागतात. तरुणवर्ग शेतमजुरीला येत नसल्यानेही मजूर मिळणे मुश्किल झाले आहे.

- विष्णू पाटील, शेतकरी, सांगलीवाडी