शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बिहारी हात फुलवताहेत सांगलीची बागायत; डाळिंब, द्राक्षपट्ट्यात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या ...

सांगली : सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात बागायती क्षेत्र वाढले, तशी शेतकऱ्यांना मजुरांची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या मजुरीच्या तुलनेत सध्या तीन-चार पटींनी मजुरी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वेगाने वळला आहे. त्याशिवाय परप्रांतीय मजुरांची गर्दीही जिल्ह्यात वाढली आहे.

पुरुष मजुराला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कामासाठी ४५० रुपये द्यावे लागत आहेत. याच कामासाठी महिला मजूर २५० रुपये घेत आहे. बडे शेतकरी जादा पैसे देऊन मजूर खेचत असल्यानेही मजुरीत वाढ होत गेली आहे.

याला पर्याय म्हणून यंत्रे येत असली तरी काही विशिष्ट कामांना मजुरांशिवाय गत्यंतर नाही. यावर उपाय शोधताना शेतकरी चक्क बिहार, उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत. मिरज, तासगाव, खानापूर तालुक्यांचा द्राक्षपट्टा, तसेच जत, आटपाडीच्या डाळिंब पट्ट्यात हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर राबताना दिसत आहेत. घाऊक स्वरूपात कामे ठेक्याने घेऊन करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बराच दिलासा मिळाला आहे. ऊसतोडीलाही यंत्रांचा वापर सुरू आहे.

मजुरांच्या जागी ट्रॅक्टर आणि ड्रोनदेखील!

वाढलेली मजुरी, मजुरांची टंचाई यामुळे यांत्रिकीकरण झाले. उसाच्या भरणीपासून तोडीपर्यंत सर्व कामांसाठी यंत्रे वापरली जाताहेत. शाळू, सोयाबीन, मक्याची पेरणी, द्राक्षाची औषध फवारणी, हळदीची भरणी, पाचटाचे गठ्ठे बांधणे, सरी सोडणे, ठिबकसाठी औषध मिसळणे ही सारी कामे ट्रॅक्टर आणि ड्रोनद्वारे होताहेत.

फक्त भांगलणीला मजूर

भांगलणी वगळता अन्य बहुतांशी कामे यंत्राने सुरु झाली आहेत. मोठ्या पिकांत मात्र यंत्रे चालत नसल्याने मजुरांचा वापर करावा लागतो.

मोठ्या शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. द्राक्षबागेच्या कामासाठी कर्नाटकातून मजूर आणावे लागतात. जादा पगारासह त्यांच्या वाहतुकीचाही खर्च करावा लागतो. यांत्रिकीकरण झाले असले तरी काही ठराविक कामांसाठी मजुरांशिवाय पयार्य नाही.

- दिलीप बुरसे, बागायतदार, बेडग

द्राक्षबागेसाठी बिहारी मजूर उपलब्ध करावे लागले. स्थानिक मजुरांचे पगार परवडत नाहीत, शिवाय ते नियमितपणे कामही करत नाहीत. बिहारी कामगार अंगावर घेऊन वेळेत कामे पूर्ण करतात. त्यामुळे सोनी, भोसे भागात हजारोंच्या संख्येने उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर आम्ही आणलेत.

- सुरेश नरुटे, शेतकरी, सोनी

मोठ्या शेतकऱ्यांनी मजूर मिळविण्यासाठी पगार वाढवत नेले, त्याचा त्रास छोट्या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चार-पाचशे रुपये मजुरी देणे त्यांना परवडत नाही. शेतीची कामे घरातूनच करावी लागतात. तरुणवर्ग शेतमजुरीला येत नसल्यानेही मजूर मिळणे मुश्किल झाले आहे.

- विष्णू पाटील, शेतकरी, सांगलीवाडी