शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेड राजकारणात उतरणार...

By admin | Updated: March 8, 2015 00:20 IST

मनोज आखरे : आठव्या महाअधिवेशनास सांगलीत सुरुवात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार

सांगली : इतर बऱ्याच पक्ष, संघटनांनी राजकारणात जे कपटकारण केले ते आमची संघटना कधीही करणार नाही. भविष्यात संभाजी ब्रिगेडला समाजकारणाचा विचार घेऊन राजकारणात उतरावे लागेल, असेही स्पष्ट संकेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांनी आज (शनिवारी) संघटनेच्या महाअधिवेशनात दिले.
मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सांगलीत आठव्या राज्य महाअधिवेशनास आज सुरुवात झाली. उद्घाटनाच्या सत्रात प्रदेशाध्यक्ष आखरे म्हणाले की, ब्राह्मणी प्रतिगामी विचार पुन्हा प्रबळ होऊ पहात आहेत. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी आता ब्रिगेडला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. आपण मैदानात उतरलो नाही, तर आपल्याला गोळ््या घातल्या जातील. हिंमत असेल तर भ्याड हल्ला करणाऱ्या ब्राह्मणी व्यवस्थेने रस्त्यावर यावे, आम्हीही रस्त्यावर येऊ. कोणात किती बळ आहे, ते दिसून येईल. ब्रिगेडवर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. ही संघटना हिंसेचा पुरस्कार करणारी आहे, असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात अन्यायाविरोधात लढण्याला हिंसा म्हटले जात नाही. शहीद भगतसिंगांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे न्याय्य हक्कासाठी आम्ही लढत राहू. ‘अडवा आणि जिरवा’ या पद्धतीला आम्ही राजकारणाऐवजी कपटकारण असे म्हणतो. समाजकारणालाच राजकारण समजणाऱ्या शिवरायांचे विचार घेऊन आम्ही राजकीय मैदानात उतरू.
आ. जगन्नाथ शिंदे म्हणाले की, ब्रिगेडने दुय्यम श्रेणीतील नोकऱ्यांमध्येही बहुजन समाजाची मुले समाविष्ट व्हावीत, त्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर केवळ नोकऱ्यांवरच विसंबून न राहता स्वयंरोजगारातून समाजातील तरुणांनी स्वत:ला सिद्ध करावे. अन्य धर्माचा आदर करूनच राजकारणात काम केले पाहिजे.
मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे म्हणाले की, राजकारणात काम करताना अन्य राजकीय पक्षांनी व नेत्यांनी केले त्याच गोष्टी अपेक्षित नाहीत. समाजकारणाच्या दृष्टीने त्यांनी राजकारणात उतरावे. तरुणांचा केवळ आर्थिक विकास करून चालणार नाही. त्यांच्या सर्वंकष विकासाचे धोरण स्वीकारून काम करावे. राष्ट्रवादीचे वैभव शिंदे यांनीही भाषण केले. महापालिका विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार हाफिज धत्तुरे, डॉ. संजय पाटील, स्वागताध्यक्ष तथा उद्योजक सतीश चव्हाण, दिनकर पाटील, पप्पू पाटील-भोयर, निर्मला पाटील, श्रीरंग पाटील, सौरभ खेडेकर उपस्थित होते.
ब्राह्मणवाद्यांकडूनच पानसरेंची हत्या
कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, शहीद अशोक कामटे, विजय साळसकर यांच्या हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केल्या आहेत, असा गंभीर आरोप ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी यावेळी केला. आम्ही ब्राह्मणवाद्यांविरोधात रस्त्यावर उतरलो नाही, तर आमचाही अशाचपद्धतीने बळी जाईल, असेही ते म्हणाले.
विचारांची संस्कृती हवी
महापौर विवेक कांबळे म्हणाले की, ज्यावेळी आम्ही चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करीत होतो, त्यावेळी काही ब्राह्मणवाद्यांनी आम्हाला विरोध केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रतिगामींना विरोध करण्याचा जो विचारांचा मार्ग दाखवून दिला आहे, त्या विचाराची संस्कृती घेऊन पुढे गेले पाहिजे.