शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठच्या ग्रामस्थांनी मगरींपासून सावध रहावे

By admin | Updated: August 18, 2015 00:36 IST

जयंत पाटील : कसबेडिग्रज हल्लाप्रकरणी वन अधिकाऱ्यांची घेतली बैठक

सांगली/कसबे डिग्रज : कृष्णाकाठी मगरींचा वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे त्यांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली. मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेले उमराव घाडगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते सोमवारी कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे आले होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर लगेचच पाटील यांनी ग्रामस्थ, प्राणीमित्र व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सांगलीतील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. पाटील म्हणाले, मगरींकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन महिन्यात वाढले आहेत. मगरीच्या भीतीमुळे दैनंदिन कामासाठी नदीवर, पाणवठ्यावर जाणे बंद करणे शक्य नाही, तरीही ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी. विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल एस. एम. खोत यांनी मगरींपासून संरक्षणासाठी जाळी लावावी, प्रबोधन फलक लावावेत, असे उपाय सुचविले. मात्र ते फारसे उपयुक्त नसून, कृष्णाकाठ मगरींच्या दहशतीखाली असल्याचे सरपंच अजयसिंह चव्हाण यांनी सांगितले. यावेळी अजित ऊर्फ पापा पाटील, तबरेज खान, किरण नाईक, विशाल गायकवाड, आनंदराव नलवडे, मोहनराव देशमुख, कमलाकर पाटील, अण्णासाहेब सायमोते उपस्थित होते. (प्रतिनिधी/वार्ताहर)