शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीसाठी तत्परता, मिरजेबाबत उदासीनता

By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST

सुधारित नळपाणी योजना : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका

 सदानंद औंधे / मिरज
सांगलीसाठी सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली. मात्र मिरजेतील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडली आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने दूषित पाण्याच्या समस्यांने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गॅस्ट्रोने अनेक बळी गेल्यानंतर शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तत्पुरती मलमपट्टी सुरू आहे. मात्र सुधारित नळपाणीपुरवठा योजना सुरू झाल्याशिवाय दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न संपणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मिरजेच्या नळपाणी योजनेचा ४५ कोटींचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे, तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत आणखी काही वर्षे मिरजेतील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
मिरज शहरासाठी ५० हजार लोकसंख्येला नळ पाणी पुरवठा करणारी ५० वर्षांपूर्वीची जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरली आहे. मिरजेत सुमारे २० हजार नळ ग्राहकांना दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना, २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. सतरा वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. कर्जाऊ निधी मिळण्यासाठी आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्य शासनामार्फत योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून कर्जाऊ मिळते. मात्र योजनेसाठी आर्थिक तरतूद नसल्याने जुन्या नळपाणीपुरवठा योजनेतून दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरसेवकांचे मौन
महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत मिरजेतील कारभाऱ्यांचे वर्चस्व असतानाही सांगली शहरासाठी सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाली व मिरजेची योजना रखडली. आता महापालिकेत काँग्रेस सत्तेवर असताना मिरजेतील २४ नगरसेवकांचे सुधारित नळपाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष आहे. कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनीच्या कामाला शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून दगडफेक करणारे नगरसेवक आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात १३ बळी गेल्यानंतरही मौन धारण करून असल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.