शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम भू-विकास बॅँकांबाबत सकारात्मक चर्चा

By admin | Updated: November 23, 2014 00:43 IST

प्रश्न पुनरुज्जीवनाचा : राज्यातील सर्वच बँकांना दिलासा देण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

अविनाश कोळी, सांगली :राज्यातील अडचणीत सापडलेल्या ‘भू-विकास’च्या २१ बँका व शिखर बँकांच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न नव्या सरकारदरबारी मांडण्यात आला आहे. चौगुले समितीने केलेल्या शिफारशीनुसार अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी राज्य सहकारी भू-विकास बँक कर्मचारी संघटनेने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नुकतीच केली. राज्यातील ११ सक्षम भू-विकास बँकांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून नव्या शासनामार्फत हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडविला जावा, अशी अपेक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी व्यक्त केली आहे. भू-विकास बँकांच्या आर्थिक स्थितीचा व त्यावरील निष्कर्षांचा अहवाल चार्टर्ड अकाऊंटंट डी. ए. चौगुले समितीने तत्कालीन आघाडी शासनाकडे सादर केला होता. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही आघाडी सरकारने याबाबत कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भू-विकास कर्मचारी संघटनेने नव्या सरकारदरबारी हा प्रश्न मांडण्यास सुरुवात केली आहे. सहकारमंत्री व सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांसमवेत याबाबतची प्राथमिक चर्चा नुकतीच झाली. चौगुले समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील भू-विकास बँकांचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने केवळ त्याबाबत सकारात्मक पावले उचलायला हवीत, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांसमोर मांडले. अहवालातील मुद्देही त्यांच्यासमोर मांडण्यात आले. चौगुले समिती व शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड अशा अकरा बँका त्यांचे दायित्व देण्यास समर्थ आहेत. शासनाने बँक गॅरंटीपोटी दिलेली रक्कम सॉफ्ट लोन म्हणून मान्य केल्यास राज्यातील सर्वच जिल्हा बँका २३० कोटी ११ लाख रुपयांनी फायद्यात येऊ शकतात. या दोन्ही गोष्टींकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. सहकारमंत्र्यांनी सक्षम बँकांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर्मचारी संघटनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.